Friday, September 10, 2021

गणेशपूजनातील २१ पत्री

*गणेश पूजनादरम्यान ची २१ पत्री (वनस्पती)*

 गणेश पूजनादरम्यान २१ प्रकारच्या पत्री वाहतात. 
या प्रथेमागे पूर्वजांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे मानवाच्या सभोवताली असणार्‍या निसर्गामधील अनमोल औषधी-खजिन्याचे ज्ञान पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा शास्त्रीय हेतू डोळ्यांसमोर ठेवूनच गणेशचतुर्थीसारख्या सर्वप्रिय सणावेळी पत्री वाहण्याची प्रथा पूर्वजांनी सुरू केली आहे. हजारो वर्षांच्या निरीक्षण व संशोधनानंतर मिळालेले औषधी-ज्ञान वेगवेगळ्या आजारांचा सामना करण्यासाठी पुढील पिढ्यांनाही विनासायास मिळावे हा महत्त्वाचा हेतू या पत्री वाहाण्यामागे आहे, हे उघड आहे.

*गणेशपूजनातील २१ पत्री*

🌿 *१. #अगस्ती (हादगा)*
अगस्तीची म्हणजेच हादग्याची पाने (Sesbania Grandiflors). प्राचीन ग्रंथांमध्ये नेत्रविकारांवर अगस्तीचे प्रयोग सापडतात. जीवनसत्त्व 'अ' हे दृष्टीला पोषक असतेत्या जीवनसत्त्वाचे वनस्पतिज रूप अर्थात बीटाकॅरोटिन हे तत्त्व अगस्तीच्या पानांमध्ये ४५००० यूजी- एवढय़ा प्रचंड प्रमाणात, म्हणजे गाजरापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात असते.

🌿 *२. #अर्जुन*
अर्जुनपत्रे (Terminallia Arjuna). अर्जुन हा वृक्ष त्याच्या हृदयपोषक गुणधर्माबद्दल प्रसिद्ध आहे. 'अर्जुनारिष्ट' हे हृदयावरील औषध प्रसिद्ध आहेच. अर्जुनामध्ये मुबलक प्रमाणात असणार्‍या नैसर्गिक कॅल्शिअममुळे अर्जुनाच्या सेवनाने हाडे हस्तिदंताप्रमाणे मजबूत होतात, अशी आयुर्वेदाची मान्यता आहे.

🌿 *३. #आघाडा*
अपामार्ग म्हणजे आघाडा (Achyranthus Aspera). आघाड्याचे बरेचसे गुणधर्म हे स्त्रियांसाठी-स्त्रीरोगांवर, विशेष उपयुक्त असे आहेत.

🌿 *४. #कण्हेर*
करवीर म्हणजे कण्हेर (Nerium Odorum). हिचा उपयोग तारतम्याने करतात, कारण कण्हेरीच्या विषबाधेने हृदय व श्वसनक्रिया बंद पडून आकडी येऊन तोंड वेडेवाकडे होते.

🌿 *५. #केवडा*
केवड्याची पाने. (PendenusTectoritus). केवड्याच्या फुलाच्या रसामध्ये तयार केलेले तूप सेवन केल्यास ते मूत्रविकारावर उपयोगी पडते. दीर्घकालीन डोकेदुखीमध्ये किंवा इतर शिरारोगांमध्ये केवड्याचा लेप लावला जातो.

🌿 *६. #जातिपत्र*
जातिपत्रे अर्थात जाईची पाने (Jasminum Oriculatum). जाई व्रणरोपक आहे. एखादा बरा न होणारा व्रण (जखम) जाईच्या पानांच्या काढ्याने धुऊन, त्या जखमेवर ठेचलेली पाने लावली असता जखम बरी होते.

🌿 *७. #दाडिमपत्रे*
 अर्थात डाळिंबाची पाने (Punica Granatum). चवीला आंबट असूनही पित्तशामक असलेल्या निवडक फळांमध्ये आवळ्याबरोबर डाळिंबाचा समावेश होतो. डाळिंब आतड्याच्या रोगांवरचे गुणकारी औषध आहे. मुळाची साल ही कृमिघ्न आहे; विशेषत टेपवर्मचा (चपटय़ा कृमीं) त्रास याने नाहीसा होतो. उपलब्ध औषधे: दाडिमावलेह, दाडिमाष्टक चूर्ण. लहान मुलांना होणार्‍या जंत, जुलाब यांसारख्या आजारांमधील डाळिंबाची उपयुक्तता सर्वमान्य आहे.

🌿 *८. #बृहतीपत्रे*
बृहतीपत्रे म्हणजे डोरलीची पाने (Solanum Indicum). डोरलीसारखे रूप असणार्‍या रिंगणीच्या फळांचा व बियांचा धूर तोंडामध्ये घेतल्यास दंतकृमींचा त्रास कमी होतो, दातदुखी कमी होते आणि दात किडण्याची प्रक्रिया थांबते.

🌿 *९. #तुळसीपत्र*
तुळशीची पाने (Ocimum Sanctum), तुळशीचा सर्वप्रसिद्ध गुणधर्म म्हणजे तुळस ही सर्दी-कफ-तापावरचे प्रभावी औषध आहे. पावसाळ्याच्या दिवसात तर घरामध्ये तुळस असायलाच हवी, इतकी तुळस त्या दिवसांमधील विविध आजारांवर उपयुक्त आहे. गजकर्ण (रिंगवर्म) या त्वचाविकारावर तुळशीचा रस लावल्यास फायदा होतो.

🌿 *१०. #दूर्वांकुर*
दूर्वा (Cynodon Dectylon). गणपती हे तेज (उष्ण) तत्त्वप्रधान दैवत आहे आणि उष्णतेचे शमन करणारी एक प्रमुख वनस्पती म्हणजे दूर्वा. आयुर्वेदात वर्णिलेल्या पित्तशामक वनस्पतींमध्ये दूर्वा हे एक आद्य औषध आहे.

🌿 *११. #देवदार*
चरकसंहितेमधील अनेक रोगांवरील औषधी-प्रयोगांमध्ये देवदाराचा (Pinus Deodora) समावेश आहे. देवदाराच्या झाडाला सुरदारू असेसुद्धा म्हटले जाते.

🌿 *१२. #धत्तुरपत्र*
धत्तूरपत्र म्हणजे धोत्र्याची पाने (Datura Stramonium) हे श्वसनविकारावरील एक प्रभावी औषध आहे. परंतु धोत्र्याचा विषारी गुण योग्य-पर्याप्त मात्रेमध्ये वापरल्यासच औषधासारखा उपयोगी पडतो; अन्यथा घातक होऊ शकतो.

🌿 *१३.  #अश्वत्थपत्रे पिंपळपान*
अश्वत्थ पत्रे अर्थात पिंपळाची पाने (Phycus Religiosa). पिंपळ हा भारतातील अतिशय प्राचीन असा वृक्ष आहे; ज्याचे संदर्भ आयुर्वेदच नव्हे तर ऋग्वेदामध्येही सापडतात. संपूर्ण समाजाच्या आरोग्याची काळजी घेणार्‍या पिंपळासारख्या वृक्षांची लागवड आणि जतन करण्याची आठवण गणेशपूजनाच्या निमित्ताने करून देण्यात आलेली आहे.

🌿 *१४. #बेलपत्र*
बेलाची पाने (Aegle Marmelos. बिल्व या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती आतड्यांच्या आजारांवरील एक उत्तम औषध आहे. बेलाची तयार औषधे : बिल्वादी चूर्ण, बिल्वावलेह, बेल-मुरांबा, इत्यादी.

🌿 *१५. #बदरीपत्र*
बदरीपत्र म्हणजे बोरीची पाने (Zizyphus Vulgaris). बोराच्या बीचे चूर्ण पाण्याबरोबर घेतल्यास सारखी खा-खा होण्याचा आजार कमी होतो. बोराच्या पानांची चटणी तांदुळाच्या कांजीबरोबर घेतल्यास माणसाचा लठ्ठपणा कमी होतो.

🌿 *१६. #मरुपत्र*
मरुपत्र म्हणजे मरव्याची पाने (Origanum Margorana). मरवा अतिशय आल्हाददायक सुगंधी असतो. शरीराच्या कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे हार्मोन्स तयार करणार्‍या सर्व अंतस्रावी ग्रंथींची राणी समजल्या जाणार्‍या पियूषिका ग्रंथीला उत्तेजना देण्याचा नैसर्गिक सुगंधाहून दुसरा सोपा उपाय नाही, असे आयुर्वेद म्हणतो.

🌿 *१७. #मधुमालती*
मधुमालती म्हणजे मालती (शास्त्रीय नाव - Jasminum Grandiflorum). ही पत्री प्रामुख्याने मुखरोगांवर उपयुक्त वनस्पती आहे.

🌿 *१८. #भृंगराजपत्री*
भृंगराजपत्र अर्थात माक्याची पाने (Eclipta Alba) माक्याचा महत्त्वाचा उपयोग म्हणजे 'केश्य गुणधर्म'. केसांची वाढ आणि रंग या दोन्ही पातळ्यांवर तो उपयोगी ठरतो.

🌿 *१९. #अर्कपत्रे*
अर्कपत्रे म्हणजे रुईची पाने. (Calotropis procera.) रुई उत्तम कफनाशक औषध आहे. एकंदरच शरीरातील विविध ग्रंथींना उत्तेजना देऊन त्यांचे कार्य सुधारणारे आणि पर्यायाने शरीराचा चयापचय निरोगी करणारे असे हे औषध आहे.

🌿 *२०. #विष्णुक्रान्ता*
विष्णुक्रान्ता म्हणजे शंखपुष्पी (Evolvulus Alsinoides). बुद्धि-स्मृतिवर्धक म्हणून सुप्रसिद्ध असणारी ही शंखपुष्पी, बुद्धीवर आलेले मांद्याचे विघ्न दूर करते.

🌿 *२१. #शमीपत्र*
शमीची पाने (Prosopis Spicigera). शमी हा शब्द 'शमयति रोगान् इति' म्हणजे रोगांचे शमन करणारी ती शमी , म्हणुन नाव पडलं शमी.

संकलित #

Saturday, July 31, 2021

बिल गेट्स यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात काही अशा गोष्टी (१० नियम)

बिल गेट्स यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात काही अशा गोष्टी (१० नियम) सांगितल्या ज्या कोणत्याही शाळेत शिकविल्या जात नाहीत. 

नियम १ - आयुष्य खडतर आहे, त्याची सवय करुन घ्या.

नियम २ - जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही. स्वत:बद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करुन दाखवा. स्वतःला सिध्द करा.

नियम ३ - कॉलेजमधून बाहेर पडल्या-पडल्या पाच आकडी पगाराची अपेक्षा करु नका. एका रात्रीत कोणी व्हाईस प्रेसिडंट होत नाही, त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात.

नियम ४ - आज कदाचित तुम्हाला तुमचे शिक्षक कडक आणि भीतीदायक वाटत असतील, कारण अजून बॉस नावाचा प्राणी तुमच्या आयुष्यात यायचाय.

नियम ५ - तुम्ही केलेली चूक ही सर्वस्वी तुमची चूक आहे आणि तुमचा पराजय ह सर्वस्वी तुमचा पराजय आहे. कोणाला दोष देऊ नका, झालेल्या चुकीपासून धडा घ्या आणि पुढे चालत रहा.

नियम ६ - तुमचे पालक तुम्ही जन्माला यायच्या आधी एवढे कंटाळवाणे आणि अरसिक नव्हते जेवढे तुम्हाला ते आता वाटतात. तुमचेच संगोपन करण्याठी त्यांनी जे अमाप कष्ट घेतलेत त्यामुळेच आज त्यांचा स्वभाव असा झाला आहे.

नियम ७ - उत्तेजनार्थ पारितोषिक हा प्रकार फक्त शाळेतच पहायला मिळतो. काही शाळांमध्ये तर अगदी पास होईपर्यंत परीक्षा देता येते. बाहेरच्या जगातील पद्धत मात्र वेगळीच असते. खऱ्या जगात हरणाऱ्याला कोणीही दुसरी संधी देण्यास तयार नसतो.

नियम ८ - आयुष्याच्या शाळेत इयत्ता आणि तुकडी नसते, त्यामध्ये मे महिन्याची सुट्टी नसते. स्वतःचा शोध घ्यायला, नवीन काही शिकायला कोणी तुम्हाला वेळ नाही देत. तो वेळ तुमचा तुम्हालाच शोधायचा असतो.

नियम ९ - टीव्हीवरचे जीवन काही खरे नसते आणि खरे आयुष्य म्हणजे टीव्हीवरची सीरियल नसते. खरया आयुष्यात आराम नसतो, असते ते फक्त काम आणि काम.

नियम १० - सतत अभ्यास करणाऱ्या आणि अपार मेहनत करणारया तुमच्या मित्रांना चिडवू नका. एक दिवस असा येईल की तुम्हाला त्यांच्याच हाताखाली काम करावे लागेल 

नियम ११ - आयुष्यातल्या संधी कधीच संपत नाहीत. एक गेली तर दुसरी लगेच आपल्या समोर उभी राहते.

Friday, July 9, 2021

अशी कशी ग घुमी तु!!

प्रत्येक विवाहित पुरुषाने आवर्जून वाचावं, ही विनंती. . .
👇

*#अशी_कशी_ग_तू_घुमी* 

सीमा ला जाऊन महिना झाला होता. पंधरा दिवस थांबलेली पाहुणे मंडळी आपापल्या घरी गेली होती. मुलगा US ला आणि मुलगी कोलकोत्याला जॉब करीत होते. तेही निघाले.

 मुलगी म्हणाली, "चला ना बाबा सोबत काही दिवसासाठी".

 मात्र सुधीर नी नकार दिला... 

रात्री त्याला भयंकर शांत वाटू लागलं...

पस्तीस वर्षाच्या सहजीवनात असं कधीच एकटं राहण्याचा प्रसंग आला नव्हता. त्याला सीमा सोबत घालवलेले दिवस आठवू लागले. कधी भांडण, तंटा झालेला सुद्धा आठवत नव्हतं. आपण कितीही आदळ आपट केली तरी ती मात्र शांतच राहायची. लोकांच्या दृष्टीने एक आदर्श जोडी. सीमा होतीच तशी. सगळयांशी मिळून मिसळून राहणारी. सुधीर नी कधी विचारही केला नाही ती अशी आपल्याला अर्ध्यावर सोडून जाईल... 

"सीमा तुझ्याशिवाय जीवन ही कल्पनाच करत नाही ग. कस जगू मी सीमा "सुधीरला हुंदका अनावर झाला... 

सीमा चे लग्न झाले तेव्हा ती वीस वर्षाची. लग्नानंतर प्रायमरी शिक्षिकेची नोकरी लागली. नोकरी, घर सांभाळत नेटाने संसार केला. मुलं चांगली शिकली. चांगल्या पदावर नोकरीला लागली. मुलामुलींचं लग्न झालं. आताच कुठे सीमा सेवानिवृत्त झाली होती. किती ठरविले होते आपण की निवृत्त झाल्यावर दोघंही मस्त फिरू.  सगळं छान असताना अशी अचानक निघून गेली. अचानक हार्ट फेल झाले. ... लक्षातच आलं नाही. अगदी शेवटच्या क्षणी लक्षत आलं. वेळच मिळाला नाही ट्रीटमेंट घ्यायला आणि  अचानक निघून गेली... 

सुधीर नी डोळे पुसले आणि कपडे बदलायचे म्हणुन कपाट उघडलं त्याला हवा तो शर्ट दिसत नव्हता म्हणुन वरच्या कप्प्यात हात घातला.. एक डायरी खाली पडली

थरथरत्या हातानी डायरी उघडली.... 

त्यानी डायरी वाचायला सुरवात केली.. 

दि, =====

नुकतंच लग्न होऊन महिना झालाय. घरचं वातावरण फार विचित्र आहे.सासू सासरे सतत भांडत असतात आणि भावाभावात पण विशेष पटत नाही.  नवरा तसा चांगला परंतु मी म्हणेल ती पूर्व दिशा म्हणणारा. एक दोनदा काही बोलून पाहिलं पण तो आपलं ऐकणारा नाही हे कळलं त्यामुळे तुम्ही म्हणाल तस असं म्हणुन जगायचं ठरविले.. 
 बरंच काही लिहिलं होत.. तो पान  पलटवत होता...

दि...... 

आज आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस. ह्यांना म्हटलं ,"आपण बाहेर जाऊ. सिनेमाला जाऊ आणि बाहेरच जेऊ या ".
तर म्हणाले, "मला नाही आवडत. तुला खायचं असेल तर  चाल... तू खा मी तुला सोडतो हॉटेलला".

अरे, हे काय बोलणं झालं... मला काय खायला जायची हौस होती.... 

मैत्रिणी सांगायच्या आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला आम्ही बाहेर फिरायला गेलो... नवऱ्याने गिफ्ट दिलं ... फार हेवा वाटायचा... कारण इथे काहीच आवडत नव्हतं .. काही म्हटलं तर चिडचिड आणि भांडण.... 

त्यानंतर मी बाहेर चला म्हणणेच सोडले...... 

दि....
 माझा मुलगा पाच वर्षाचा आहे. माझ्याकडे आई आलेली.. आमच्या गप्पा गोष्टी सुरु होत्या. मुलानी खाताना इकडे तिकडे सांडवलेलं. हे बाहेरून आले. कचरा पाहून डोकं फिरलं. बडबड सुरु झाली. मी म्हटलं करते ना साफ. थांबा थोडा वेळ. माहिती नाही काय इगो दुखावला. अगदी अंगावर धावून आलेत, हात उचलला. माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आले. मलाही खुप अपमानित वाटले, खुप राग आला. असं वाटल सोडून जावं परंतु तेवढी हिम्मत नव्हती आणि त्यांचा राग उतरला की परत चांगले वागतात. आपण काही चुकीचं वागल.. हीच मन दुखावलं हे ज्ञानीही नसत... मी मात्र विसरू शकत नाही.. सगळं दुःख. मनाच्या एका कोपऱ्यात बंद करून ठेवते... आणि परत कधी ठेचं लागली तर कप्पा उघडून बघते... फार त्रास होतो तेव्हा.. 

दि,.... 

आज मी पडद्याचे कापडं आणले... खुप ओरडले.. 

कुठलीही गोष्ट ह्यांच्याच मनाप्रमाणे व्हावी. मला घर सजवायला खुप आवडायचं.. काही विकत घेऊ या म्हटलं तर त्यावर लेक्चर देणार.. तुला वापरायची तरी अक्कल आहे का   वगैरे वगैरे... काही कधी विकत आणले तर त्यात खोट काढणार. तुझी पसंद चांगली नाही... तुला व्यवहार समजत नाही.. तुला लोक ठगवतात... इतक बोलणं होतं की वाटतं कशाला आणलं आपण विकत... त्यानंतर मात्र काहीही विकत आणले नाही.... 

पानांमागून पान पलटवू लागला.. प्रत्येक पानावर त्याच्या तक्रारीच लिहिल्या होत्या. रमेश ला खुप आश्चर्य वाटले की आपल्याला कधी वाटलेच नाही की सीमा इतकी दुःखी आहे. सीमाच्या मनात इतकी कटुता असून ती वरून चांगलीच वागायची. आणखी एक पान पलटवले.... बहुतेक शेवटचे 

दि.... 
आज खुप डावा हात दुखतोय. यांना सांगून काय उपयोग. दवाखान्यात चला म्हटलं तर बडबड करणार त्यापेक्षा नकोच मीच जाऊन येते.... तसंही ह्यांना बाहेरगावी जायचं आहे.

दि.... 

काल मैत्रिणीसोबत दवाखान्यात जाऊन आली... डॉक्टरांनी सगळ्या तपासण्या केल्या.. Ecg मध्ये प्रॉब्लेम निघाला.. त्यानंतर अँजिओग्राफी सांगितली...

यांना फोन लावला... म्हणाले ज्या काही तपासण्या करायच्या त्या करून घे... 

 अँजिओग्राफी केली....95 टक्के ब्लॉकेज... डॉक्टरांनी सांगितले ताबडतोब ओपन हार्ट सर्जरी करावी लागेल... 

घरी येऊन यांना सांगावं या विचारातच घरी आले.....हे बाहेरगावावरून आलेले होते. 

घरी येताना औषध आणायला विसरले.... खुप थकवा आला होता... 

म्हटलं, थोडी औषधं आणून देता का? 

'आताच आली ना रस्त्याने, आणायची ना स्वतः,परत कपडे बदलवू, परत जाऊ "
.
"खुप चिडचिड आणि बडबड केली "

"असू द्या, मी घेईल उद्या "

"अग, पण काय झालंय.... काय सांगितलं डॉक्टरांनी "

"काही नाही, सगळं ठीक आहे "

मी ह्यांना काहीही सांगितलं नाही... साधी औषध आणायला सांगितली तर किती त्रास ? आणि आपलं ऑपरेशन असलं तर किती त्रास करून घेतील.. तसंही आपण जगून काय करायचं.. मुलगा, मुलगी सेटल आहे... रोजची लहान सहान बाबीवरून कटकट... आता मी थकली... हार्ट प्रॉब्लेम म्हणजे मरताना त्रासही होणार नाही.. शांतपणे जाता येईल.. घेतच नाही आता औषध आणि जातच नाही आता दवाखान्यात........ 

डायरीचे शेवटचेच पान होते. 

सुधीर नी डायरी बंद केली.. डोळ्यातून अश्रू वाहू लागले... सीमा चा हार्ट अटॅक नसून आत्महत्या आहे आणि त्याला कारणीभूत मी आहे....

सीमा, माझं वागणं तुला पटत नव्हतं तर तेव्हाच विरोध करायचा ना... तुझ्या मनात एवढा असंतोष होता हे कधी मला कळलंच नाही.. मला वाटायचं आपण एकरूप आहोत परंतु नाही, तुझं शरीर फक्त माझ्या सोबत होत आणि तुझं मन?? ते तर कधी माझं झालंच नाही..... 

का वागली तू अशी सीमा ? कोणत्या गुन्ह्यांची शिक्षा दिलीस तू? सीमा मी तुला समजूच शकलो नाही... आणि तू मला समजून घेतलं नाही.... 

मी तू आणि मी वेगळे आहोत असं कधी विचारच केला नाही... मला वाटायचं मी माझा निर्णय तुला सांगतो आणि तो तुला पटतोय.. तुझ्यावर लादतोय असं कधी मला वाटतच नाही... तुझं मन मला कधी वाचताच आलं नाही.... पण सीमा, अग एकदा बोलायचं होत ग.. व्यक्त व्हायच होत... भांडलो असतो कदाचित... परंतु कदाचित मला तुझं म्हणणं पटलं ही असत... नसत पटलं तर निदान मला अपराधी पणाची भावना घेऊन तर जगावं नसत लागलं.... सीमा, *अशी कशी ग घुमी तु!!*

🍁🍂🍁🍂🍁🍂

CP