Sunday, December 12, 2021

मना सज्जना...

मना सज्जना...

लहानपणी शुभंकरोति, मनाचे श्लोक, रामरक्षा अशा गोष्टी आपण म्हणतच असतो. त्या नित्य पठनात असतात. कदाचित लहान वयात पाठ झाल्यामुळे त्या दीर्घकाळ लक्षातही राहतात. अर्थात हे पूर्वीचे अनुभव आहेत. आपण आता त्या संस्कारक्षम परिपाठाला कालबाह्य ठरविले आहे. काही गोष्टींवर धार्मिकतेचा, आध्यात्मिकतेचा शिक्का मारून त्या बाजूला ठेवण्याची आपली एक नवीनच आधुनिक (?) जीवनशैली सुरू झाली आहे. बरे, आपण त्याला काही नवीन पर्याय शोधले काय, तर तसेही नाही. 27 नोव्हेंबरच्या लेखांकात आपण मनाचे श्लोक, गीता अशा गोष्टींचे लहानपणापासून पाठांतर असेल तर पुढे जीवनात विविध प्रसंगी त्या समृद्ध पाथेयाचा कसा उपयोग होतो, याचा थोडा विचार केला आहे. खरे तर मनाच्या श्लोकांचा फार आध्यात्मिक खोलात न शिरता अगदी लौकिक, व्यावहारिक दृष्टीने विचार केला तरीही मनाला समर्थ करणारी ती उपासना आहे, हे कळल्याशिवाय राहात नाही. अर्थात प्रपंच आणि परमार्थ असा भेद समर्थांना मान्य नाही. जीवन एकात्म असतं. त्यामुळे असा भेद करताच येत नाही.
मनाच्या श्लोकांच्या पहिल्याच श्लोकांत समर्थ आपल्या डोळ्यासमोर एक ध्येय ठेवतात. कोणत्या मार्गाने जायचं आहे, हे ते मनाला सुचवतात. ‘गमू पंथ आनंत या राघवाचा’ अशी आपल्या मनाला ते स्पष्ट सूचना देतात. हा मार्ग ‘आनंत’ आहे, म्हणजे काय? हा मार्ग व्यापकतेकडे, विशालतेकडे नेणारा आहे. ‘छोटे दिलसे कोई बडा नहीं हो सकता. टुटे दिलसे कोई खडा नहीं हो सकता।’ 

माणसांमध्ये विकासाच्या अनंत शक्यता असतात, हे कळले म्हणजे मन छोटेही राहात नाही आणि एखाद्या क्षुल्लक कारणामुळे खचतही नाही. अनंताच्या मार्गावर चालताना आपल्याच संकुचित सीमा तोडाव्या लागतात, मर्यादा ओलांडाव्या लागतात, झापडं काढावी लागतात, दृष्टिकोन व्यापक करावा लागतो. ‘अनंत’ या शब्दातच व्यापक होण्याची प्रक्रिया सामावलेली आहे. त्याकरिता राघवाचे विशाल रूप जाणून घेतल्याशिवाय संकुचित भाव नाहीसा होतच नाही. म्हणूनच रामाची विविध रूपं विभिन्न श्लोकांमधून मनावर ठसविण्याचा समर्थ प्रयत्न करतात. समर्थांचा राम कोदंडधारी आहे. त्याला पाहून काळही थरारतो. तो पूर्ण प्रतापी आहे, सर्वगुणी आहे, एखाद्या शिलेप्रमाणे जीवन झालेल्या निराश अहल्येमध्येही त्यांनी चैतन्य निर्माण केलं. तो दीनानाथ आहे, निर्भय आहे, ब्रिदाचे रक्षण करणारा आहे. विवेकी आहे. अनंत शब्द कळला नाही तर माणसं कर्मकांड, पूजा, विधीपर्यंतच मर्यादित राहतात. राघव मार्गावर चालताना हे भान आवश्यकच आहे.

हा मनासोबत सुरू असलेला संवाद आहे. ‘मना सज्जना भक्तिपंथेची जावे’ या दुसर्‍या श्लोकात दोन महत्त्वाची सूत्रं आहेत. समर्थांनी मनाला अनेक श्लोकांमध्ये वारंवार ‘सज्जन’ म्हणूनच संबोधले आहे. आपण बाहेर काय दाखवतो यापेक्षा आपण आपल्याला मनातून काय समजतो, हे अधिक महत्त्वाचे आहे. डॉ अल्बर्ट एलिस एक जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या एका पुस्तकात ते काय म्हणतात पहा, ‘‘स्वत:ला ‘चांगला माणूस’ समजा. (समर्थांच्या भाषेत सज्जन) कारण तुमच्या सुखी, कार्यक्षम जगण्याला ते उपकारक ठरतं. आणि तरीही समजून घ्या की, ते तुमचं मूल्यांकन चूक असू शकतं. कारण कधी कधी तुम्ही वाईट वागू शकता आणि वेगवेगळ्या स्थळी आणि काळी ते सुसंगत असेलच असे नाही. स्वयंमूल्याची समस्या त्यामुळे सोपी होते इतकेच. (आपले दोष, चुका, मनाच्या वाईट सवयी, नकारात्मक भावनांच्या आहारी जाणे, अशा अनेक दोषांची जाणीव समर्थही अनेक श्लोकांतून करून देतात.) स्वत:ला सांगत राहा की, मी एक चांगला माणूस आहे. माझं अस्तित्व मला समृद्ध करायचं आहे. माझं अस्तित्वच मला ‘चांगलं माणूसपण’ बहाल करतं. (देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेचि क्रिया धरावी।)’’ (‘मन कराया प्रसन्न’ या अनुवादित पुस्तकातून. कंसातील मजकूर पुस्तकातील नाही.) 

समर्थही मानसशास्त्राच्या भूमिकेतून विचार करतात, हे या उतार्‍यावरून स्पष्ट होते. कोणताही माणूस पूर्णपणे वाईट िंकवा पूर्णपणे चांगला नसतो. एखादे विशिष्ट वागणे म्हणजे संपूर्ण ‘मी’ नाही, हे समजून घ्यावे लागते. माणसात बदल करण्याची क्षमता असते. तो चांगला असतो म्हणूनच स्वत:ला बदलण्याचा विचार त्याच्या मनात येतो. म्हणूनच स्वत:ला सज्जन समजणे, म्हणजे प्रामाणिकपणे स्वत:ला स्वीकारणे आणि बदलाकरिता स्वत:ला तयार करणे. स्वत:ला सज्जन समजण्यात खोटेपणा नाही. दंभ, दांभिकता मुळातच असता कामा नये, असे समर्थ वारंवार बजावतात. तसेच स्वत:ला अतिचांगलं समजणं, मोठं समजणं अशा प्रकारचा अहंभावही त्यात नको. या अहंभावात न कळत माणूस दुसर्‍याला कनिष्ठ समजतो. हा अहंकार दु:खाचे कारण असतो. त्याचाही स्वत:च शोध घ्यायला समर्थ सांगतात. ‘अहंतागुणे सर्वही दु:ख होते’ ‘अहंता तुझी तूचि शोधूनि पाहे’ अशा शब्दात मनाला ते प्रोत्साहित करतात. दुसरीकडे मनातच न्यूनगंड असेल, माणूस स्वत:लाच मनातून कमी लेखत असेल, वाईट समजत असेल तर बदलाची शक्यताच नाही. मनातून पराभूत होणं सर्वात घातक असतं. म्हणूनच ‘मना सज्जना’ असे संबोधून समर्थ आत्मविश्वास वाढवतात. 

हीन, दीन, दुर्बळ, भयभीत असणं समर्थांना मान्यच नाही. ‘नको दैन्यवाणे जिणे भक्तिऊणे’ भक्त दैन्यवाणा असूच शकत नाही. ‘हरिभक्त वीरभक्त विज्ञानराशी, जेणे मानसी स्थापिले निश्चयाशी।’ असेही ते म्हणतात. त्यांची भक्त संकल्पना, वीरतेशी, ज्ञानाशी, निश्चयाशी जोडलेली आहे.
‘मना सज्जना भक्तिपंथेची जावे’ या ओळीतील ‘सज्जना’ या पहिल्या सूत्राची आपण चर्चा केली. या श्लोकात ‘भक्तिपंथेचि जावे’ हे दुसरे महत्त्वाचे सूत्र समर्थ मनाला सांगतात. आजकाल आपण भक्ती शब्दाचा संबंध अंधश्रद्धेशी जोडतो आणि दुर्दैवाने भक्तीमध्ये असलेल्या ‘भावना’ या शक्तीकडे दुर्लक्ष करतो. भक्ती हा भावनांचे नियमन करण्याचा सशक्त मार्ग आहे. कळते पण वळत नाही, असे आपण म्हणतो. या वळण्याचा संबंध भावनेशीच असतो. मनाची ओढ भावनेवरच अवलंबून असते. प्रबळ, उत्कट भावना असल्याशिवाय एखादी गोष्ट आपण पूर्णपणे झोकून देऊन करूच शकत नाही. यशस्वी होण्याच्या मार्गातल्या मुख्य अडचणी भावनांमुळेच निर्माण होतात. भावनाच माणसाला दुर्बळ करतात, हळव्या बनवतात, विचलित करतात. माणसामध्ये उत्क्रांतीच्या प्रवाहात अनेक प्रकारच्या भावना निर्माण झाल्या. त्यांच्या परिणामांवरून आज आपण नकारात्मक भावना व सकारात्मक भावना असा भेद करतो. जेव्हा आपण शुद्ध भक्तीचा मार्ग स्वीकारतो तेव्हा सकारात्मक भावनांचे पोषण करीत असतो. 

आपण स्वीकारलेल्या मार्गावर, ध्येयावर, आदर्शांवर आपली भक्ती असते, त्याच वेळी यशाच्या शक्यता निर्माण होतात. भक्तीमुळेच तन्मयता आणि एकाग्रता प्राप्त होते. भक्ती माणसाला खंबीर, अविचल बनवते. भक्तीमुळेच संकटांवर व अडचणींवर मात करण्याचे सामर्थ्य येते. जो विभक्त नाही, तो भक्त. भक्ती माणसाला ध्येयाशी जोडते. भक्तीमध्ये कोणत्या भावना असतात? भक्तीमध्ये असते प्रेम, तादात्म्यता, समर्पण, निरहंकारिता. आणि याच भावना यशाकरिता, आनंदाकरिता, विकासाकरिता आवश्यक असतात. अहंकारातच अनेक नकारात्मक भावनांचा उगम असतो. मत्सर, लोभ, क्रोध अशा भावनांची तीव्रता वाढली तर दु:ख, अशांती, अस्वस्थता, नैराश्य वाट्याला येते. यापासून दूर राहण्याचा सल्ला समर्थ पुन्हा पुन्हा देतात. सर्वोत्तम दासाकडून या गोष्टी अपेक्षितच नाहीत, हे मनाला ते सतत सांगत असतात.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावनांचा पाठिंबा असल्याशिवाय विचारांचे रूपांतर कृतीत िंकवा वर्तनात होत नाही. आपल्या भावना, विचार आणि कृती यात विसंगती असते. हे ऐक्य साध्य करणे कोणत्याही उद्दिष्ट्यपूर्तीकरिता आवश्यक असते. भक्ती म्हणजे विचारांच्या मागे भावनेचे सामर्थ्य उभे करणे. समर्थ फक्त भक्तिपंथाचा सल्ला देऊन थांबत नाहीत. ‘जनी जाणता भक्त होऊनि राहे।’ असे म्हणून ते जाणता भक्त, ज्ञानी भक्त होण्याच्या मार्गाकडे मनाला नेतात. आणि ‘जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा’ असा मापदंडही सांगतात. मनाच्या श्लोकात ‘विवेक’ हा शब्द सर्वाधिक वेळा आला आहे. विवेकनिष्ठ विचारपद्धतीचा ते वारंवार पुनरुच्चार करतात. ‘धरा जानकीनायकाचा विवेकू’ ‘बोलण्यासारखे चाल बापा’ ‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे’ असे मनाला समर्थ सतत आवाहन करीत असतात. ‘जनी बोलण्यासारिखे आचरावे, क्रियापालटे भक्तिपंथेचि जावे।’ अशा श्लोकांमधून विचार, भावना आणि कृती यांचे ऐक्य असलेला हा भक्तिपंथ आहे, हे स्पष्ट करतात. खरे तर या तीनही गोष्टींमध्ये एकत्रित तसेच वेगवेगळे बदल घडवून आणणे म्हणजेच ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा विचार करणे. आध्यात्मिक परिभाषा वापरली की, आपल्याला ते कठीण वाटायला लागते.

‘मना सज्जना....’ या ओळीत मनाच्या प्रशिक्षणाची ‘सज्जना’ आणि ‘भक्तिपंथेचि जावे’ ही दोन महत्त्वाची सूत्रे दिल्यानंतर सज्जन कोण, हेही समर्थ याच श्लोकात स्पष्ट करतात. ‘जनी निंद्य ते सर्व सोडूनि द्यावे, जनी वंद्य ते सर्व भावे करावे।।’ जनी याचा अर्थ समाजात. कोणत्याही समाजात नीतिनियमांचे काही मापदंड प्रस्थापित झालेले असतात. सज्जनशक्तीच्या आधारावरच खरे म्हणजे सामाजिक जीवन चालत असते. समाजात जे िंनदनीय असते ते सर्व सोडून द्यावे आणि जे वंदनीय असते ते करावे. िंनदनीय गोष्टींकरिता समर्थ ‘सर्व’ शब्द वापरतात. 

आपल्याला एखाद्या गोष्टींचा अपवाद करण्याची सवय असते. ‘चलता है’ हा आपला स्वभाव असतो. पण समर्थांचा सर्व गोष्टी सोडण्यावर कटाक्ष आहे. सज्जन माणसांचं समाजात अनुकरण होत असतं. वाईट गोष्टी माणसं सहजपणे स्वीकारतात. पण चांगल्या गोष्टींचे अनुकरण तितक्या सहजपणे होत नाही. सज्जनांनीच मापदंड पातळ करायला सुरुवात केली तर समाजावर त्याचे परिणाम होणारच आहेत. दुसरीकडे वंदनीय गोष्टींसाठी समर्थ ‘सर्व भावे’ असे विशेषण वापरतात. याचा अर्थ वंदनीय गोष्टी मनापासून केल्या पाहिजेत. कायदा पाळावाच लागतो म्हणून पाळणं आणि मनापासून पाळणं, यात फरक आहे. वाहतूक नियमांच्या बाबतीत आपण पाहतोच. सज्जनांचा तो स्वभाव असला पाहिजे. सज्जन माणसांच्या अनेक गुणांविषयी वेगवेगळ्या श्लोकांमध्ये विभिन्न पद्धतीने समर्थ मनासोबत संवाद करतात. 
मना सज्जना येक जीवी धरावे
जनी आपुले हित तूवा करावे।
रघुनायकावीण बोलो नको हो
सदा मानसी तो निजध्यास राहो।।

एक गोष्ट ते मनात पक्की धरून ठेवायला सांगतात. ते म्हणजे समाजात आपले हित तुला करून घेता आलेच पाहिजे. एकदा राघवमार्ग स्वीकारला आहे ना? मग आता अन्य गोष्टी बोलण्यात वेळ घालवू नको. अशानेच मग ध्येयाला अनेक फाटे फुटतात. मनात सदैव आपल्या ध्येयाचाच निजध्यास घे. सज्जन माणसाला आपले हित साधता आलेच नाही, तोच अपयशी झाला तर सज्जनपणाला अर्थ काय? अशाने सज्जनपणावरचा विश्वास उडणार नाही काय? हा श्लोक कितीतरी अर्थांची वलयं मनामध्ये निर्माण करतो. हेच मनाच्या श्लोकांचे सामर्थ्य आहे. त्या सामर्थ्याचे अनेक पैलू आहेत. आणखी काही पैलूंचा विचार पुढील लेखांकात करू.

रवींद्र देशपांडे
8888803411
दैनिक तरुण भारत, नागपूर

माणुसकी...

*आपलं यश डोळे भरून....*
*बघणारी माणसं हवीत......* 

दुसऱ्या साठी करताना सुद्धा ........ 
आपल्याला झेपेल इतकंच करावं..
अनेकदा आपण कोणताही स्वार्थ नसताना .....
अनेकांसाठी बरंच काही करतो..झटतो.........  
प्रत्येक वेळी आपलीच जबाबदारी म्हणून...... 
कर्तव्य म्हणून पुढे पुढे करतो....
कोणताही स्वार्थ नसतांना.. 
मतप्रवाह तर दोन्ही बाजूंनी असतात..... 
ज्याच्यासाठी करतो त्याला वाटतं ........ 
केलं आमच्यासाठी तर काय फरक पडतो..
त्यांचं कर्तव्यच आहे..

करणाऱ्याचा हेतू स्वच्छ असतो.. 
आपल्या प्रयत्नाने कुणाचं तरी भलं व्हावं.....  
हा निर्मळ प्रयत्न असतो......... 
गैरसमज हा फार मोठा शत्रू असतो....... 
तो या निर्मळ भावनेलाच धोका निर्माण करतो...

ज्याला समजून घ्यायचंय ...... 
तो समजूतदारपणे गोष्टी हाताळतो...
ज्याला समजून घ्यायच॔च नाही ...... 
तो शब्दाचा किस पाडतो...
शब्दांनी घायाळ करतो...

नात्यांची खरी मेख तर इथेच आहे...
माझं माझं करता करता ...... 
आपण आपल्यांना दुखावतो........ 
घालून पाडून बोलतो.......... .
परिणाम फक्त वाईटच होतात...
संबंध दुरावले जातात..... 
आपुलकीतला रस संपत जातो...
उरते ती फक्त निराशा...

हल्ली तर नाती आर्थिकदृष्टीतच बांधलेली दिसतात..
जणू पैसा म्हणजे सर्वस्व...
अमक्याने अमक्या कार्यक्रमात ....... 
आहेर दिला नाही म्हणून राग...
रस्त्याने जाताना ओळखीचे बोलले नाही हा राग...
एखाद्या प्रसंगांत मागे उभे राहिले नाही म्हणून राग...

निर्व्याज प्रेम .. जिव्हाळा.. काळजी.. कुटुंबातील प्रेम 
हे सगळंच विरळ होत चाललंय ...

एकमेकांना टाळ्या देत हास्याची कारंजी उडणं लुप्त होतंय...

खरं बघितलं तर किती दिवस आपण जगणार .... 
याची काहीच शाश्वती नाही....... 
सोबतीला काय घेऊन जाणार हेही माहीत नाही....

जिव्हाळ्याची अगदी कमी माणसं असतात .... 
जी आपली काळजी करतात......... 
जीव ओतून आपल्याला घडवतात.. 
वेळप्रसंगी आपल्या भल्यासाठी रागावतात ..
पण परत माया करतात..
त्यांचा विसर कधीच पडू देऊ नये..

कोणाला व्यक्त होता येतं तर कोणाला नाही.. 
हा समजूतदारपणा अंगी यायला हवा..

जगण्यासाठी दिवस फार कमी आहेत.. 
तक्रारी मात्र त्यानंतर ही सुरूच असणार..

दुसऱ्याला दुःखी करून ....... 
आपण सुखी व्हावं ही भावना किती बोचरी आहे...

आयुष्य फक्त धावण्याची स्पर्धा नाही... 

मिळेल ते अनुभव ..
मिळेल ती उपेक्षा ..
मिळेल ते प्रेम... आदर.. 
मिळेल ती अनुभूती घ्यावी... 

प्रवाहात मुक्त जगावं.. 
जीवनात सगळेच रंग हवेत... 
निराशेतही आशा आहेच की... 
त्या ऊर्जेची वाट बघायची..

कोणा वाचून कोणाचं अडत नसतंच खरं तर..
पण ....... 
आनंद मात्र घेता येत नाही तो आपल्या माणसांशीवाय...

कौतुक करणारं..
पाठीवर हात ठेवणार कुणीतरी हवंच ना....

आपल्या दुःखाच्या प्रसंगी डोळ्यात अश्रू येणारी... 
आपलं यश डोळे भरून बघणारी ....... 
माणसं ही हवीतच अवतीभवती... 

नाहीतर यश .. पैसा खूप मिळवला ....
पण ........... 
माणसंच नसतील प्रेम करणारी 
तर त्या सारखा दरिद्री तोच...खरं ना..??....

Wednesday, November 3, 2021

From a small village in Andhra Pradesh to founding a $17 billion pharma company

From a small village in Andhra Pradesh to founding a $17 billion pharma company

A Mega-Thread on the story of an Indian billionaire scientist: Murali Devi of DivisLabs

1) Murali Divi belongs from Machilipatnam, a small town in Andhra Pradesh.
2) He comes from a very humble family background. His father ran the family of 14 on a narrow allowance of just ₹10,000 per month.
3) After completing his doctorate in pharmaceutical sciences from Andhra's Kakatiya University, he spent a few years in the US. 
4) Divi failed his intermediate exams (the equivalent of higher secondary) twice due to weak English.
5) However, instead of giving up, Divi doubled down and grabbed the opportunity to go to the US as a pharmacist instead of becoming a chemist like his elder brothers.
6) When Divi left India for the states in 1976, he was 25 years old with just $7 in his hands.
7) From there, he went on to draw a salary of $65,000 a year at US companies like Trinity Chemical and Fike Chemical.
8) He would soon come back to India with his wife and children with $40,000 and no plans.
9) In 1984 he teamed up with Kallam Anji Reddy to build Cheminor, which later in the year 2000 got merged with Dr. Reddy’s Laboratories.
10)To turn it around, Reddy and Murali Divi took over Cheminor, an ailing contract manufacturing company.
11)The idea was generated for Cheminor to be the contract manufacturing arm of Dr. Reddy, while Dr. Reddy’s concentrated on generics and drug discovery.
12)But reviving Cheminor was an improbable order. The company possessed only a few chemical reactors.
13)The equipment present was used to produce APIs, which were churning outdated products.
14)Divi took charge and stepped in as a managing director, hired a fresh crew of graduates, and trained them in the chemistry skills required to revive the firm.
15)His team included chemists who worked on developing a cost-effective manufacturing process for the API, ibuprofen.
16)A year later, the team had set up a production line which was soon scaled up to 1,200 metric tonnes catering to 25 % of the global demand for the compound.
17) On an ordinary day, Murali Divi would show up at 7:30 in the morning at his office in Hyderabad, work continuously till lunch, and then spend the entire day at the manufacturing plant to monitor the production line.
18)He would sometimes remain at the plant till midnight, ironing out kinks in the production process and hand holding his employees through any problems.
19)When he resigned Cheminor in 1990, almost 125 people resigned the same day. That tells you how well he handled people.
20)Six years later, Divi founded Divi’s Laboratories, his own pharma company. Headquartered in Hyderabad, the company makes active pharmaceutical ingredients (API) and intermediates as APIs are the critical inputs for making a drug.
21)The initial plan was to focus on customizing and manufacturing small quantities of a drug for clinical trials and laboratory experiments by big pharma companies. But international pharma giants were suspicious of outsourcing to India.
22)Naproxen is an ingredient that is popularly known as an anti-inflammatory drug. It was a crowded market, and Divis was the 22nd firm to enter it behind giants such as Swiss health care company Roche and chemical and biotech firm Lonza Group.
23)But Murali Divi had made some headway in developing an efficient process to manufacture the compound and saw an opportunity there.
24)This was a time when the industry still depended on traditional chemistry methods to produce drugs.
25) These methods were simple but inefficient because they used chemicals as catalysts, increasing costs and leading to pollution.
26) He turned to newer technologies that used enzymes instead of chemicals as catalysts and devised an efficient production process for Naproxen.
27)Today, Divis Laboratories is one of the world’s largest manufacturers of Naproxen. 
28)Over time they have snatched market share to manufacture APIs such as Dextromethorphan (cough suppressant) from Lonza, pharmaceutical arm of Dutch material and life science company DSM.
29)Since the pandemic, Murali Divi has seen his wealth more than twofold to ~ $10 billion now.
30)One of the secrets of Divi’s rise to be the second-biggest drug maker in the country is its ability to scale up capacity and cut costs using advanced technology.
31)Divi’s Labs has a strong relationship with big pharma companies, including six out of the top ten innovators, Merck, Pfizer, and GlaxoSmithKline.
32)From nowhere in 1990, Divi’s Labs is now one of the top three API manufacturers in the world.


Friday, September 10, 2021

गणेशपूजनातील २१ पत्री

*गणेश पूजनादरम्यान ची २१ पत्री (वनस्पती)*

 गणेश पूजनादरम्यान २१ प्रकारच्या पत्री वाहतात. 
या प्रथेमागे पूर्वजांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे मानवाच्या सभोवताली असणार्‍या निसर्गामधील अनमोल औषधी-खजिन्याचे ज्ञान पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा शास्त्रीय हेतू डोळ्यांसमोर ठेवूनच गणेशचतुर्थीसारख्या सर्वप्रिय सणावेळी पत्री वाहण्याची प्रथा पूर्वजांनी सुरू केली आहे. हजारो वर्षांच्या निरीक्षण व संशोधनानंतर मिळालेले औषधी-ज्ञान वेगवेगळ्या आजारांचा सामना करण्यासाठी पुढील पिढ्यांनाही विनासायास मिळावे हा महत्त्वाचा हेतू या पत्री वाहाण्यामागे आहे, हे उघड आहे.

*गणेशपूजनातील २१ पत्री*

🌿 *१. #अगस्ती (हादगा)*
अगस्तीची म्हणजेच हादग्याची पाने (Sesbania Grandiflors). प्राचीन ग्रंथांमध्ये नेत्रविकारांवर अगस्तीचे प्रयोग सापडतात. जीवनसत्त्व 'अ' हे दृष्टीला पोषक असतेत्या जीवनसत्त्वाचे वनस्पतिज रूप अर्थात बीटाकॅरोटिन हे तत्त्व अगस्तीच्या पानांमध्ये ४५००० यूजी- एवढय़ा प्रचंड प्रमाणात, म्हणजे गाजरापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात असते.

🌿 *२. #अर्जुन*
अर्जुनपत्रे (Terminallia Arjuna). अर्जुन हा वृक्ष त्याच्या हृदयपोषक गुणधर्माबद्दल प्रसिद्ध आहे. 'अर्जुनारिष्ट' हे हृदयावरील औषध प्रसिद्ध आहेच. अर्जुनामध्ये मुबलक प्रमाणात असणार्‍या नैसर्गिक कॅल्शिअममुळे अर्जुनाच्या सेवनाने हाडे हस्तिदंताप्रमाणे मजबूत होतात, अशी आयुर्वेदाची मान्यता आहे.

🌿 *३. #आघाडा*
अपामार्ग म्हणजे आघाडा (Achyranthus Aspera). आघाड्याचे बरेचसे गुणधर्म हे स्त्रियांसाठी-स्त्रीरोगांवर, विशेष उपयुक्त असे आहेत.

🌿 *४. #कण्हेर*
करवीर म्हणजे कण्हेर (Nerium Odorum). हिचा उपयोग तारतम्याने करतात, कारण कण्हेरीच्या विषबाधेने हृदय व श्वसनक्रिया बंद पडून आकडी येऊन तोंड वेडेवाकडे होते.

🌿 *५. #केवडा*
केवड्याची पाने. (PendenusTectoritus). केवड्याच्या फुलाच्या रसामध्ये तयार केलेले तूप सेवन केल्यास ते मूत्रविकारावर उपयोगी पडते. दीर्घकालीन डोकेदुखीमध्ये किंवा इतर शिरारोगांमध्ये केवड्याचा लेप लावला जातो.

🌿 *६. #जातिपत्र*
जातिपत्रे अर्थात जाईची पाने (Jasminum Oriculatum). जाई व्रणरोपक आहे. एखादा बरा न होणारा व्रण (जखम) जाईच्या पानांच्या काढ्याने धुऊन, त्या जखमेवर ठेचलेली पाने लावली असता जखम बरी होते.

🌿 *७. #दाडिमपत्रे*
 अर्थात डाळिंबाची पाने (Punica Granatum). चवीला आंबट असूनही पित्तशामक असलेल्या निवडक फळांमध्ये आवळ्याबरोबर डाळिंबाचा समावेश होतो. डाळिंब आतड्याच्या रोगांवरचे गुणकारी औषध आहे. मुळाची साल ही कृमिघ्न आहे; विशेषत टेपवर्मचा (चपटय़ा कृमीं) त्रास याने नाहीसा होतो. उपलब्ध औषधे: दाडिमावलेह, दाडिमाष्टक चूर्ण. लहान मुलांना होणार्‍या जंत, जुलाब यांसारख्या आजारांमधील डाळिंबाची उपयुक्तता सर्वमान्य आहे.

🌿 *८. #बृहतीपत्रे*
बृहतीपत्रे म्हणजे डोरलीची पाने (Solanum Indicum). डोरलीसारखे रूप असणार्‍या रिंगणीच्या फळांचा व बियांचा धूर तोंडामध्ये घेतल्यास दंतकृमींचा त्रास कमी होतो, दातदुखी कमी होते आणि दात किडण्याची प्रक्रिया थांबते.

🌿 *९. #तुळसीपत्र*
तुळशीची पाने (Ocimum Sanctum), तुळशीचा सर्वप्रसिद्ध गुणधर्म म्हणजे तुळस ही सर्दी-कफ-तापावरचे प्रभावी औषध आहे. पावसाळ्याच्या दिवसात तर घरामध्ये तुळस असायलाच हवी, इतकी तुळस त्या दिवसांमधील विविध आजारांवर उपयुक्त आहे. गजकर्ण (रिंगवर्म) या त्वचाविकारावर तुळशीचा रस लावल्यास फायदा होतो.

🌿 *१०. #दूर्वांकुर*
दूर्वा (Cynodon Dectylon). गणपती हे तेज (उष्ण) तत्त्वप्रधान दैवत आहे आणि उष्णतेचे शमन करणारी एक प्रमुख वनस्पती म्हणजे दूर्वा. आयुर्वेदात वर्णिलेल्या पित्तशामक वनस्पतींमध्ये दूर्वा हे एक आद्य औषध आहे.

🌿 *११. #देवदार*
चरकसंहितेमधील अनेक रोगांवरील औषधी-प्रयोगांमध्ये देवदाराचा (Pinus Deodora) समावेश आहे. देवदाराच्या झाडाला सुरदारू असेसुद्धा म्हटले जाते.

🌿 *१२. #धत्तुरपत्र*
धत्तूरपत्र म्हणजे धोत्र्याची पाने (Datura Stramonium) हे श्वसनविकारावरील एक प्रभावी औषध आहे. परंतु धोत्र्याचा विषारी गुण योग्य-पर्याप्त मात्रेमध्ये वापरल्यासच औषधासारखा उपयोगी पडतो; अन्यथा घातक होऊ शकतो.

🌿 *१३.  #अश्वत्थपत्रे पिंपळपान*
अश्वत्थ पत्रे अर्थात पिंपळाची पाने (Phycus Religiosa). पिंपळ हा भारतातील अतिशय प्राचीन असा वृक्ष आहे; ज्याचे संदर्भ आयुर्वेदच नव्हे तर ऋग्वेदामध्येही सापडतात. संपूर्ण समाजाच्या आरोग्याची काळजी घेणार्‍या पिंपळासारख्या वृक्षांची लागवड आणि जतन करण्याची आठवण गणेशपूजनाच्या निमित्ताने करून देण्यात आलेली आहे.

🌿 *१४. #बेलपत्र*
बेलाची पाने (Aegle Marmelos. बिल्व या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती आतड्यांच्या आजारांवरील एक उत्तम औषध आहे. बेलाची तयार औषधे : बिल्वादी चूर्ण, बिल्वावलेह, बेल-मुरांबा, इत्यादी.

🌿 *१५. #बदरीपत्र*
बदरीपत्र म्हणजे बोरीची पाने (Zizyphus Vulgaris). बोराच्या बीचे चूर्ण पाण्याबरोबर घेतल्यास सारखी खा-खा होण्याचा आजार कमी होतो. बोराच्या पानांची चटणी तांदुळाच्या कांजीबरोबर घेतल्यास माणसाचा लठ्ठपणा कमी होतो.

🌿 *१६. #मरुपत्र*
मरुपत्र म्हणजे मरव्याची पाने (Origanum Margorana). मरवा अतिशय आल्हाददायक सुगंधी असतो. शरीराच्या कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे हार्मोन्स तयार करणार्‍या सर्व अंतस्रावी ग्रंथींची राणी समजल्या जाणार्‍या पियूषिका ग्रंथीला उत्तेजना देण्याचा नैसर्गिक सुगंधाहून दुसरा सोपा उपाय नाही, असे आयुर्वेद म्हणतो.

🌿 *१७. #मधुमालती*
मधुमालती म्हणजे मालती (शास्त्रीय नाव - Jasminum Grandiflorum). ही पत्री प्रामुख्याने मुखरोगांवर उपयुक्त वनस्पती आहे.

🌿 *१८. #भृंगराजपत्री*
भृंगराजपत्र अर्थात माक्याची पाने (Eclipta Alba) माक्याचा महत्त्वाचा उपयोग म्हणजे 'केश्य गुणधर्म'. केसांची वाढ आणि रंग या दोन्ही पातळ्यांवर तो उपयोगी ठरतो.

🌿 *१९. #अर्कपत्रे*
अर्कपत्रे म्हणजे रुईची पाने. (Calotropis procera.) रुई उत्तम कफनाशक औषध आहे. एकंदरच शरीरातील विविध ग्रंथींना उत्तेजना देऊन त्यांचे कार्य सुधारणारे आणि पर्यायाने शरीराचा चयापचय निरोगी करणारे असे हे औषध आहे.

🌿 *२०. #विष्णुक्रान्ता*
विष्णुक्रान्ता म्हणजे शंखपुष्पी (Evolvulus Alsinoides). बुद्धि-स्मृतिवर्धक म्हणून सुप्रसिद्ध असणारी ही शंखपुष्पी, बुद्धीवर आलेले मांद्याचे विघ्न दूर करते.

🌿 *२१. #शमीपत्र*
शमीची पाने (Prosopis Spicigera). शमी हा शब्द 'शमयति रोगान् इति' म्हणजे रोगांचे शमन करणारी ती शमी , म्हणुन नाव पडलं शमी.

संकलित #

Saturday, July 31, 2021

बिल गेट्स यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात काही अशा गोष्टी (१० नियम)

बिल गेट्स यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात काही अशा गोष्टी (१० नियम) सांगितल्या ज्या कोणत्याही शाळेत शिकविल्या जात नाहीत. 

नियम १ - आयुष्य खडतर आहे, त्याची सवय करुन घ्या.

नियम २ - जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही. स्वत:बद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करुन दाखवा. स्वतःला सिध्द करा.

नियम ३ - कॉलेजमधून बाहेर पडल्या-पडल्या पाच आकडी पगाराची अपेक्षा करु नका. एका रात्रीत कोणी व्हाईस प्रेसिडंट होत नाही, त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात.

नियम ४ - आज कदाचित तुम्हाला तुमचे शिक्षक कडक आणि भीतीदायक वाटत असतील, कारण अजून बॉस नावाचा प्राणी तुमच्या आयुष्यात यायचाय.

नियम ५ - तुम्ही केलेली चूक ही सर्वस्वी तुमची चूक आहे आणि तुमचा पराजय ह सर्वस्वी तुमचा पराजय आहे. कोणाला दोष देऊ नका, झालेल्या चुकीपासून धडा घ्या आणि पुढे चालत रहा.

नियम ६ - तुमचे पालक तुम्ही जन्माला यायच्या आधी एवढे कंटाळवाणे आणि अरसिक नव्हते जेवढे तुम्हाला ते आता वाटतात. तुमचेच संगोपन करण्याठी त्यांनी जे अमाप कष्ट घेतलेत त्यामुळेच आज त्यांचा स्वभाव असा झाला आहे.

नियम ७ - उत्तेजनार्थ पारितोषिक हा प्रकार फक्त शाळेतच पहायला मिळतो. काही शाळांमध्ये तर अगदी पास होईपर्यंत परीक्षा देता येते. बाहेरच्या जगातील पद्धत मात्र वेगळीच असते. खऱ्या जगात हरणाऱ्याला कोणीही दुसरी संधी देण्यास तयार नसतो.

नियम ८ - आयुष्याच्या शाळेत इयत्ता आणि तुकडी नसते, त्यामध्ये मे महिन्याची सुट्टी नसते. स्वतःचा शोध घ्यायला, नवीन काही शिकायला कोणी तुम्हाला वेळ नाही देत. तो वेळ तुमचा तुम्हालाच शोधायचा असतो.

नियम ९ - टीव्हीवरचे जीवन काही खरे नसते आणि खरे आयुष्य म्हणजे टीव्हीवरची सीरियल नसते. खरया आयुष्यात आराम नसतो, असते ते फक्त काम आणि काम.

नियम १० - सतत अभ्यास करणाऱ्या आणि अपार मेहनत करणारया तुमच्या मित्रांना चिडवू नका. एक दिवस असा येईल की तुम्हाला त्यांच्याच हाताखाली काम करावे लागेल 

नियम ११ - आयुष्यातल्या संधी कधीच संपत नाहीत. एक गेली तर दुसरी लगेच आपल्या समोर उभी राहते.

Friday, July 9, 2021

अशी कशी ग घुमी तु!!

प्रत्येक विवाहित पुरुषाने आवर्जून वाचावं, ही विनंती. . .
👇

*#अशी_कशी_ग_तू_घुमी* 

सीमा ला जाऊन महिना झाला होता. पंधरा दिवस थांबलेली पाहुणे मंडळी आपापल्या घरी गेली होती. मुलगा US ला आणि मुलगी कोलकोत्याला जॉब करीत होते. तेही निघाले.

 मुलगी म्हणाली, "चला ना बाबा सोबत काही दिवसासाठी".

 मात्र सुधीर नी नकार दिला... 

रात्री त्याला भयंकर शांत वाटू लागलं...

पस्तीस वर्षाच्या सहजीवनात असं कधीच एकटं राहण्याचा प्रसंग आला नव्हता. त्याला सीमा सोबत घालवलेले दिवस आठवू लागले. कधी भांडण, तंटा झालेला सुद्धा आठवत नव्हतं. आपण कितीही आदळ आपट केली तरी ती मात्र शांतच राहायची. लोकांच्या दृष्टीने एक आदर्श जोडी. सीमा होतीच तशी. सगळयांशी मिळून मिसळून राहणारी. सुधीर नी कधी विचारही केला नाही ती अशी आपल्याला अर्ध्यावर सोडून जाईल... 

"सीमा तुझ्याशिवाय जीवन ही कल्पनाच करत नाही ग. कस जगू मी सीमा "सुधीरला हुंदका अनावर झाला... 

सीमा चे लग्न झाले तेव्हा ती वीस वर्षाची. लग्नानंतर प्रायमरी शिक्षिकेची नोकरी लागली. नोकरी, घर सांभाळत नेटाने संसार केला. मुलं चांगली शिकली. चांगल्या पदावर नोकरीला लागली. मुलामुलींचं लग्न झालं. आताच कुठे सीमा सेवानिवृत्त झाली होती. किती ठरविले होते आपण की निवृत्त झाल्यावर दोघंही मस्त फिरू.  सगळं छान असताना अशी अचानक निघून गेली. अचानक हार्ट फेल झाले. ... लक्षातच आलं नाही. अगदी शेवटच्या क्षणी लक्षत आलं. वेळच मिळाला नाही ट्रीटमेंट घ्यायला आणि  अचानक निघून गेली... 

सुधीर नी डोळे पुसले आणि कपडे बदलायचे म्हणुन कपाट उघडलं त्याला हवा तो शर्ट दिसत नव्हता म्हणुन वरच्या कप्प्यात हात घातला.. एक डायरी खाली पडली

थरथरत्या हातानी डायरी उघडली.... 

त्यानी डायरी वाचायला सुरवात केली.. 

दि, =====

नुकतंच लग्न होऊन महिना झालाय. घरचं वातावरण फार विचित्र आहे.सासू सासरे सतत भांडत असतात आणि भावाभावात पण विशेष पटत नाही.  नवरा तसा चांगला परंतु मी म्हणेल ती पूर्व दिशा म्हणणारा. एक दोनदा काही बोलून पाहिलं पण तो आपलं ऐकणारा नाही हे कळलं त्यामुळे तुम्ही म्हणाल तस असं म्हणुन जगायचं ठरविले.. 
 बरंच काही लिहिलं होत.. तो पान  पलटवत होता...

दि...... 

आज आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस. ह्यांना म्हटलं ,"आपण बाहेर जाऊ. सिनेमाला जाऊ आणि बाहेरच जेऊ या ".
तर म्हणाले, "मला नाही आवडत. तुला खायचं असेल तर  चाल... तू खा मी तुला सोडतो हॉटेलला".

अरे, हे काय बोलणं झालं... मला काय खायला जायची हौस होती.... 

मैत्रिणी सांगायच्या आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला आम्ही बाहेर फिरायला गेलो... नवऱ्याने गिफ्ट दिलं ... फार हेवा वाटायचा... कारण इथे काहीच आवडत नव्हतं .. काही म्हटलं तर चिडचिड आणि भांडण.... 

त्यानंतर मी बाहेर चला म्हणणेच सोडले...... 

दि....
 माझा मुलगा पाच वर्षाचा आहे. माझ्याकडे आई आलेली.. आमच्या गप्पा गोष्टी सुरु होत्या. मुलानी खाताना इकडे तिकडे सांडवलेलं. हे बाहेरून आले. कचरा पाहून डोकं फिरलं. बडबड सुरु झाली. मी म्हटलं करते ना साफ. थांबा थोडा वेळ. माहिती नाही काय इगो दुखावला. अगदी अंगावर धावून आलेत, हात उचलला. माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आले. मलाही खुप अपमानित वाटले, खुप राग आला. असं वाटल सोडून जावं परंतु तेवढी हिम्मत नव्हती आणि त्यांचा राग उतरला की परत चांगले वागतात. आपण काही चुकीचं वागल.. हीच मन दुखावलं हे ज्ञानीही नसत... मी मात्र विसरू शकत नाही.. सगळं दुःख. मनाच्या एका कोपऱ्यात बंद करून ठेवते... आणि परत कधी ठेचं लागली तर कप्पा उघडून बघते... फार त्रास होतो तेव्हा.. 

दि,.... 

आज मी पडद्याचे कापडं आणले... खुप ओरडले.. 

कुठलीही गोष्ट ह्यांच्याच मनाप्रमाणे व्हावी. मला घर सजवायला खुप आवडायचं.. काही विकत घेऊ या म्हटलं तर त्यावर लेक्चर देणार.. तुला वापरायची तरी अक्कल आहे का   वगैरे वगैरे... काही कधी विकत आणले तर त्यात खोट काढणार. तुझी पसंद चांगली नाही... तुला व्यवहार समजत नाही.. तुला लोक ठगवतात... इतक बोलणं होतं की वाटतं कशाला आणलं आपण विकत... त्यानंतर मात्र काहीही विकत आणले नाही.... 

पानांमागून पान पलटवू लागला.. प्रत्येक पानावर त्याच्या तक्रारीच लिहिल्या होत्या. रमेश ला खुप आश्चर्य वाटले की आपल्याला कधी वाटलेच नाही की सीमा इतकी दुःखी आहे. सीमाच्या मनात इतकी कटुता असून ती वरून चांगलीच वागायची. आणखी एक पान पलटवले.... बहुतेक शेवटचे 

दि.... 
आज खुप डावा हात दुखतोय. यांना सांगून काय उपयोग. दवाखान्यात चला म्हटलं तर बडबड करणार त्यापेक्षा नकोच मीच जाऊन येते.... तसंही ह्यांना बाहेरगावी जायचं आहे.

दि.... 

काल मैत्रिणीसोबत दवाखान्यात जाऊन आली... डॉक्टरांनी सगळ्या तपासण्या केल्या.. Ecg मध्ये प्रॉब्लेम निघाला.. त्यानंतर अँजिओग्राफी सांगितली...

यांना फोन लावला... म्हणाले ज्या काही तपासण्या करायच्या त्या करून घे... 

 अँजिओग्राफी केली....95 टक्के ब्लॉकेज... डॉक्टरांनी सांगितले ताबडतोब ओपन हार्ट सर्जरी करावी लागेल... 

घरी येऊन यांना सांगावं या विचारातच घरी आले.....हे बाहेरगावावरून आलेले होते. 

घरी येताना औषध आणायला विसरले.... खुप थकवा आला होता... 

म्हटलं, थोडी औषधं आणून देता का? 

'आताच आली ना रस्त्याने, आणायची ना स्वतः,परत कपडे बदलवू, परत जाऊ "
.
"खुप चिडचिड आणि बडबड केली "

"असू द्या, मी घेईल उद्या "

"अग, पण काय झालंय.... काय सांगितलं डॉक्टरांनी "

"काही नाही, सगळं ठीक आहे "

मी ह्यांना काहीही सांगितलं नाही... साधी औषध आणायला सांगितली तर किती त्रास ? आणि आपलं ऑपरेशन असलं तर किती त्रास करून घेतील.. तसंही आपण जगून काय करायचं.. मुलगा, मुलगी सेटल आहे... रोजची लहान सहान बाबीवरून कटकट... आता मी थकली... हार्ट प्रॉब्लेम म्हणजे मरताना त्रासही होणार नाही.. शांतपणे जाता येईल.. घेतच नाही आता औषध आणि जातच नाही आता दवाखान्यात........ 

डायरीचे शेवटचेच पान होते. 

सुधीर नी डायरी बंद केली.. डोळ्यातून अश्रू वाहू लागले... सीमा चा हार्ट अटॅक नसून आत्महत्या आहे आणि त्याला कारणीभूत मी आहे....

सीमा, माझं वागणं तुला पटत नव्हतं तर तेव्हाच विरोध करायचा ना... तुझ्या मनात एवढा असंतोष होता हे कधी मला कळलंच नाही.. मला वाटायचं आपण एकरूप आहोत परंतु नाही, तुझं शरीर फक्त माझ्या सोबत होत आणि तुझं मन?? ते तर कधी माझं झालंच नाही..... 

का वागली तू अशी सीमा ? कोणत्या गुन्ह्यांची शिक्षा दिलीस तू? सीमा मी तुला समजूच शकलो नाही... आणि तू मला समजून घेतलं नाही.... 

मी तू आणि मी वेगळे आहोत असं कधी विचारच केला नाही... मला वाटायचं मी माझा निर्णय तुला सांगतो आणि तो तुला पटतोय.. तुझ्यावर लादतोय असं कधी मला वाटतच नाही... तुझं मन मला कधी वाचताच आलं नाही.... पण सीमा, अग एकदा बोलायचं होत ग.. व्यक्त व्हायच होत... भांडलो असतो कदाचित... परंतु कदाचित मला तुझं म्हणणं पटलं ही असत... नसत पटलं तर निदान मला अपराधी पणाची भावना घेऊन तर जगावं नसत लागलं.... सीमा, *अशी कशी ग घुमी तु!!*

🍁🍂🍁🍂🍁🍂

CP

Tuesday, June 22, 2021

*🌹पिशवीभर आनंद!*🌹

*🌹पिशवीभर आनंद!*🌹 

शुक्रवारी संध्याकाळी शहराच्या साधारण मध्यभागी असलेल्या एका माॅलमध्ये एक प्रौढ दांपत्य खरेदीला आले होते. 
खरं तर आता दोघेच असतात घरी, 
फारशा वस्तू लागत नाहीत पण थोडा वेळ जाईल, कंटाळवाण्या रूटिनमध्ये थोडा बदल होईल म्हणून त्यांनी शुक्रवारचा दिवस निवडला होता. 
शनिवार रविवारच्या गर्दीत त्यांना अस्वस्थ वाटायचे.  
सवयीने एक ट्राॅली घेऊन त्यांनी रॅकवर असलेल्या वस्तूंवर नजर टाकायला सुरुवात केली. 
त्याचवेळी,  त्यांचे लक्ष आजूबाजूच्या खरेदीकरता आलेल्या लोकांवर होते. 
त्यांचे लक्ष वेधून घेतले ते त्यांच्यापेक्षा लहान दांपत्याने. 
ते दोघे खरेदीत मश्गुल झाले होते.  
आवडलेली एखादी वस्तू शेल्फमधून काढून त्याची किंमत, माहिती वाचून ते बहुधा वस्तू घ्यायची की नाही हे ठरवत होते.  
एखादी गोष्ट बजेटच्या बाहेर आहे असे जाणवले की किंचीत नाराज होऊन ती वस्तू परत नीट जागेवर ठेवत होते. 
ज्येष्ठ दोघांनी हे सगळं टिपले आणि आपसात एकमेकाकडे बघून हसले  ज्येष्ठ दांपत्याला आपले नवशिकेपणाचे दिवस आठवले. 
एकेक रूपया खर्च करताना विचारपूर्वकच ठरवावे लागायचे असे ते दिवस होते.
काय वाटले कोणास ठाऊक, ते दोघे त्या वयाने लहान नवरा बायकोकडे चालत गेले. 
"नमस्कार,  आपण ओळखत नाही एकमेकांना. माझ्याकडे या माॅलचे दोन हजार रुपयांचे एक फ्री कुपन आहे. 
त्याची मुदत चार दिवसात संपणार आहे, आम्हाला काही खरेदी करायची नाही तर तुम्हाला ते कुपन दिले तर चालेल का? " 
समोरून सहाजिकच प्रश्न आला, 
"त्या बदल्यात आम्हाला किती पैसे भरावे लागतील?" 
"दोन हजारापर्यंत काहीच नाही, 
त्याहून जास्त खरेदी झाली तर मात्र वरचे पैसे भरावे लागतील. 
"ज्येष्ठ जोडप्यातल्या नव-याने  शंका समाधान केले. 
तरूण दांपत्याला आश्चर्य वाटले. त्यातली बायको म्हणाली ," 
आम्हालाच का देताय हे तुमचे कुपन? " 
"मला वाटलंच तुम्हाला हा प्रश्न पडणार.. 
कारण  मगासपासून आम्ही तुम्हाला बघतोय, आमचे सुरूवातीचे दिवस आठवले आम्ही पण असेच टॅग बघून खरेदी केली अनेक वर्षे! 
हे पहा, तुम्हाला फसवायचा, त्रास देण्याचा हेतू नाही पण वापरले नाही तर हे कुपन अगदी वाया जाईल म्हणून देतोय तुम्हाला. 
या बदल्यात  तुमची खरेदी झाली की आपण शेजारी आईसक्रीम शाॅप आहे तिथे भेटू, चालेल?" 
ज्येष्ठ स्त्रीने तोडगा काढला. 
तरूण जोडप्याने एकमेकांकडे पाहिले आणि ते कुपन घेऊन ते खरेदीकरता वळले ज्येष्ठ जोडपे कॅश काऊंटरच्या दिशेने निघाले. 
तरूण जोडप्याची चर्चा सुरू झाली, काय घ्यावे? 
त्यांना गॅसची शेगडी घ्यायची होती घरची जरा बिघडलीच होती. 
ती दोन हजारात नसती आली, मग कपडे वाळत टाकायचा स्टँड तो ही महाग होता. 
बराच काथ्याकूट झाल्यावर नवरा म्हणाला, "सरळ वाण सामान घेऊन जाऊ.."
त्याचे म्हणणे खोडत बायको म्हणाली, "तेवढं आपण दोघे आरामात कमावतो, आता अशा गोष्टी घेऊ ज्या सहसा आपण घेणार नाही." 
नव-याला लगेच पटली ही कल्पना. 
दोघांनी पटपट यादी करायला सुरूवात केली. 
मुलांसाठी मोठ्या रंगपेट्या, शाळेचे लेखन साहित्य,  चाॅकलेट, सुकामेवा, मुलांच्या आवडीचा खाऊ, स्वयंपाकघरात लागणारे लाकडी उलथन, डाव, मसाले असे बरेच काही घेताना ते सतत बेरजा करत होते. 
दोघांना मजा आली खरेदी करताना.  
कॅश काऊंटरवर वस्तू मोजून घेताना त्यांच्या लक्षात आले एक मोठी पिशवी छोट्या छोट्या वस्तूनी भरून गेली होती. 
दोघं आनंदी चेह-याने बाहेर आले. 
समोर ते दांपत्य होतेच. 
चौघे आईसक्रीम शाॅपमध्ये बसले. ऑर्डर दिली. आईसक्रीम खाताखाता ज्येष्ठ दांपत्यातला नवरा म्हणाला," पोरांनो,  ऐकाल माझे?" 
दोघे कान टवकारून ऐकू लागले. 
"आज तुम्हाला अचानक खरेदीचा योग आला. 
जर महाग गोष्ट घेतली असतीत तर एकच आली असती, पण बघा आज तुमच्या पिशवीत लहानलहान गोष्टी आहेत त्या तुम्हाला थोड्या काळासाठी का होईना खूप आनंद देणार आहेत..
आणि *जन्मभराच्या आठवणीदेखील. आपले आयुष्य असंच आहे एक महागाची मोठी गोष्ट परवडत नाही म्हणून खट्टू होऊन जगण्यापेक्षा पिशवीभर छोटे आनंद जगायला काय हरकत आहे*? 

*मोठी ध्येय असावीत पण त्यामागे धावताना रोजचे छोटे आनंद तेवढे निसटू देऊ नका*.. 
साॅरी बरं का, एकदम प्रवचनच दिले मी तुम्हाला" असे म्हणत दोघे उठले आणि गेटकडे निघालेदेखील. 
तरूण जोडप्याला "धन्यवाद" म्हणायचा वेळही न देता. 
ते दोघे भानावर आले तेव्हा त्यांना जाणवले ," अरे ते दोघे उतरले बघ.." 
बायको म्हणाली पण तोवर ते दोघे ज्येष्ठ खाली उतरले पण होते.." उतरले ग ते ! साध थँक्यू पण म्हटले नाही आपण..." नवरा म्हणाला. 
"आपली परिस्थिती सुधारली ना की *असाच पिशवीभर आनंद देऊ कोणा अपरिचिताला*..आपोआप थँक्यू पोचतील त्यांना,  काळजी नको करू." बायकोने नव-याला आश्वस्त केले. 
त्यांना जाणवले खूप मोठा धडा शिकलोय आपण. 
तो 'पिशवीभर आनंद'  घेऊन आपल्या घराकडे ते आनंदाने निघाले..

✍️अनघा किल्लेदार
पुणे.

प्रारब्ध आणि संगत...

प्रारब्ध आणि संगत..

एका भुंग्याची शेणातल्या किड्याशी गट्टी जुळली. पुढे त्यांच्यातली मैत्री खूप गाढ होत गेली. एके दिवशी किडा भुंग्याला म्हणाला, " अरे तू माझा सर्वात आवडता आणि जवळचा मित्र आहेस तर उदया तू माझ्या घरी जेवायला ये."
भुंगा दुस-या दिवशी तडक त्याच्याकडे गेला पण नंतर विचारात पडला की मला चुकीची संगत लाभली म्हणून आज शेण खायची सुद्धा वेळ आली. आता भुंग्याने किड्याला त्याच्या स्थळी येण्याचं आमंत्रण दिलं की तू उदया माझ्याकडे ये!..

दुस-याच दिवशी सकाळी किडा भुंग्याकडे गेला. भुंग्याने येताच क्षणी त्याला उचलून गुलाबाच्या फुलात बसवलं.
किड्याने परागरस चाखला.किती भाग्यवान मी!...अस म्हणून तो मित्राचे आभार मानतच होता इतक्यात शेजारच्या मंदिरातील पुजारी आला. ते गुलाब तोडलं आणि मंदिरातल्या श्रीकृष्णाच्या चरणांवर अर्पण केलं. किड्याला भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झालं तो धन्य झाला कारण त्यांच्या पायाजवळ बसण्याचं सौभाग्य लाभलं. संध्याकाळी पुजा-याने सगळी फुलं एकत्र करून गंगेत विसर्जित केली. आता किडा स्वतःच्या नशीबावर हैराण होता. इतक्यात भुंगा उडत उडत किड्याजवळ आला आणि म्हणाला,
"भाऊ, काय चालू आहे मनात?.."
किडा म्हणाला, "बंधू , जन्मोजन्मीच्या पापांची मुक्ती झाली. प्रारब्धातून सुटलो एकदाचा!..हे सर्व चांगल्या संगतीचं फळ आहे.

सांगायच तात्पर्य हेच की कोणालाच जीवनाच्या कोणत्या वळणावर आपली कोणाशी गाठभेट होणार आहे याची पूर्वकल्पना नसते. प्रत्येकाशी आपलं रक्ताचं नातं असू शकत नाही म्हणून निसर्गनियमाने काही माणसं अद्भुतरित्या आपल्या जवळ येतात जसं की नदीच्या प्रवाहात वाहताना दोन ओंडके अचानक एकत्र येतात. सोबत कुठपर्यंत असेल ते काहीच निश्चित नाही पण काही काळ एकत्र प्रवास होऊन पुढे वेळ आल्यावर विलग होतात. अशी नाती खरंच अद्भुत असतात पण फक्त ती जपण्याची जाणीव आणि आस्था आपल्यात असायला हवी.
 नात्यांमध्ये आस्था असावी पण आसक्ती नाही कारण कोणीही सोबत जन्माला येत नसतं. आपण एकटेच जन्माला आलो आणि एकटेच जाणार हे कायम लक्षात असू द्यावं मग आसक्ती निर्माण होत नाही.
मूळात आपला जन्म कशासाठी झाला आहे हे गूढ उकलता आलं तर पुढचा सर्वच प्रवास सुखकर होतो आणि 'ते उकलण्याचा एकमेव मार्ग ध्यानसाधना.' 

प्रारब्धात ठरल्याप्रमाणे कोणाकडून काही घेण असेल किंवा आपण कोणाचं देण लागत असू तर वेळ आल्यावर त्या प्रत्येक जीवाच्या भेटीच प्रयोजन कळतं म्हणून फक्त आपण कर्म करत राहावं इतकंच!...

Saturday, May 15, 2021

गरुड पुराणामध्ये सांगण्यात आलेले १० पापकर्म

*गरुड पुराणामध्ये असे १० काम सांगण्यात आले आहेत, जे पाप मानले जातात.* 

*१)पहिले पाप*
सामान्यतः स्त्रीचा अपमान कधीच करू नये, परंतु गरोदर किंवा मासिक धर्म दरम्यान स्त्रीला वाईट बोलणे महापाप आहे. अशा व्यक्तीला महादेव आणि देवता माफ करत नाहीत.

*२)दुसरे पाप*
इतरांचे धन प्राप्त करण्याची इच्छा ठेवणे, हेसुद्धा शास्त्रानुसार पाप आहे.

*३)तिसरे पाप*
एखाद्या सध्या-सरळ व्यक्तीला किंवा जीवाला कष्ट देणे, नुकसान पोहोचवणे त्यांच्यासाठी बाधा निर्माण करणे हेसुद्धा महापाप आहे.

*४)चौथे पाप*
चांगले-वाईट, चूक-बरोबर जाणून घेतल्यानंतरही चुकीचे काम करणे महापाप आहे.

*५)पाचवे पाप*
इतरांच्या पती किंवा पत्नीवर वाईट नजर ठेवणे किंवा त्यांना मिळवण्यासाठी प्रयत्न करणे हेसुद्धा महापाप आहे.

*६)सहावे पाप*
इतरांचा मान-सन्मान कमी करण्याच्या इच्छेने खोटे बोलणे, छळ-कपट करणे, षडयंत्र रचणे महापाप आहे

*७)सातवे पाप*
लहान मुलं, महिला किंवा कोणत्याही कमजोर व्यक्तीची हिंसा करणे, असामाजिक कर्म करणे महापाप आहे.

*८)आठवे पाप*
एखाद्या मंदिरातील वस्तू चोरणे किंवा चुकीच्या पद्धतीने इतरांची संपत्ती हडपणे महापाप आहे.

*९)नववे पाप*
गुरु, आई-वडील, पत्नी किंवा पूर्वजांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला महादेव कधीही माफ करत नाहीत.

*१०)दहावे पाप*
नशा करणे, दान केलेल्या वस्तू किंवा धन परत घेणे महापाप आहे. कोणत्याही अधार्मिक कामामध्ये सहभागी होणे महापाप आहे.

Friday, February 12, 2021

झोप . !.....

*झोप . !.....*
 
*अतिशय गरजेची वाचा*

शास्त्रज्ञांनी अशी एक उपाययोजना शोधली आहे की जी तुम्हाला दीर्घायुषी बनवते, तुमची स्मृती, सर्जनशीलता वाढवते, तुम्ही बारीक राहता, जास्त लक्षवेधक दिसू |लागता. ही उपाययोजना तुम्हाला सर्दी, फ्लूपासूनच नाही तर कर्करोग आणि स्मृतीभ्रंशापासून देखील वाचवू शकते. हृदयविकार, पक्षाघात, मधुमेह होण्याचा धोका कमी करते आणि तुम्हाला जास्त आनंदी आणि तणावमुक्त ठेवते..

काहींना हे वर्णन अतिरंजित वाटेल, पण यातला प्रत्येक शब्द शास्त्रीय चाचणीवर खरा उतरलेला आहे. ही बातमी ना रंजक द्रव्याची आहे ना कुठल्या जादूई औषधाची! ही आहे आठ तासांच्या शांत झोपेमुळे मिळणाऱ्या फायद्याची! आपण मात्र आज या आठ तास झोपेला फारसे महत्त्व देत नाही, ती नियमित घेत नाही आणि खरं सांगायचं तर कित्येकांना ‘ती’ येतही नाही. ती म्हणजे, झोप!

झोप म्हणजे फक्त जागेपणाचा अभाव असा अर्थ होत नाही. ती एक खूप गुंतागुंतीची, चयापचय असलेली प्रक्रिया आहे. झोप सर्वानाच जरुरी आहे. आपल्या मेंदूत एक घडय़ाळ असतं, जे अंधार, प्रकाश किंवा तापमानातील बदल यावर चालतं. ‘सरकाडियन ऱ्हिदम’ (circadian rhythm) म्हणतात याला. हे घडय़ाळ वसलेले असते ‘सुप्राकयाझमॅटिक नुक्लियस’ नावाच्या मेंदूच्या छोटय़ाशा भागात. सुप्रा म्हणजे वर आणि कयाझमा म्हणजे क्रॉसिंग. हा भाग डोळ्यातून संवेदना घेऊन येणाऱ्या दोन नसांच्या क्रॉसिंगच्या वर असल्यामुळे डोळ्यांतून आलेल्या प्रकाश संवेदना त्याला लगेच कळतात. संध्याकाळ झाली की हे घडय़ाळ मेलॅटोनीन नावाचा एक दूत मेंदूकडे पाठवते. तो इशारा देतो की, ‘अंधार होतोय, झोपेची वेळ झाली’.

प्रत्यक्ष झोप अडिनोसिन नावाचे रसायन आणते. जशी याची मात्रा वाढते मेंदूत एक प्रकारचा झोपेचा दबाव निर्माण होतो आणि झोप लागते. दिवस उजाडल्यावर प्रकाशाची संवेदना डोळ्यांतून मेंदूकडे जाते. मेलॅटोनिनचे स्रवणे बंद होते. मेंदूला उठण्याचा इशारा मिळतो. मेंदूतील घडय़ाळ आणि झोपेसाठीचा दबाव हे झोप लागण्यासाठीचे दोन महत्त्वाचे घटक आहेत. झोपेला घालवण्यासाठी लोक कॉफी पितात. कॉफीत कॅफिन असते. अडिनोसिन मेंदूच्या पेशींच्या ज्या खाचांमध्ये स्वत:ला फिट करून झोपेचा दबाव निर्माण करते त्या जागा कॅफिन चक्क  अनधिकृतरित्या बळकावते. त्यामुळे अडिनोसिनने निर्मिलेला झोपेचा दबाव मेंदूला समजत नाही. आपण जागेच राहतो.

आपण झोपतो तेव्हा आपले सारे स्नायू शिथिल होतात. जलचर प्राणी असा झोपला तर त्याला जलसमाधीच मिळायची. एका वेळेस त्यांचा अर्धाच मेंदू झोपतो, बाकी अर्धा शरीराच्या गतिविधी सांभाळतो. पक्षांमध्येही सुरक्षेसाठी हे घडते. पक्षांच्या मेंदूचा जो अर्धा भाग जागा असतो त्याच्या विरुद्ध बाजूचा डोळाही उघडा असतो. म्हणजे पक्षाचा अर्धा मेंदू संकटावर चक्क ‘डोळा’ ठेवून असतो. आपले पूर्वज दोन भागांत झोपायचे. रात्रीची लांब आणि दुपारची छोटी झोप(nap) आजकाल दुपारची झोप दुर्मिळ झाली. तरीही दर दुपारी आपला जेनेटिक कोड आपल्याला या झोपेशी जोडू पाहतो. जेवणानंतर नवीन गोष्ट लक्षपूर्वक ग्रहण करायची आपली शक्ती कमी होते. जेवणानंतरच्या मीटिंगमध्ये, वर्गांत लोक पेंगतात. ग्रीसमध्ये पूर्वी दुपारी १ ते ४ सारी दुकाने बंद असायची आणि तेव्हा त्या भागातले लोक दीर्घायुषी होते म्हणे. पुण्यातल्या लोकांचे दुपारचे बंद दुकान आणि त्यांची झोप हा चेष्टेचा विषय अनेक वर्षांपासून होता, पण शरीरशास्त्राच्या दृष्टिकोनातून ते बरोबरच होते.

झोपल्यावर आपला मेंदू जास्त क्रियाशील असतो. नवीन गोष्ट शिकण्यासाठी मेंदूला तयार करायला आणि शिकल्यानंतर ती गोष्ट पक्की लक्षात ठेवायला शांत झोप अत्यावश्यक आहे. दिवसभरात मिळालेली माहिती मेंदूत हिप्पोकॅम्पस नावाच्या भागात साठवली जाते. याची साठवण क्षमता यूएसबी ड्राइव्हसारखी छोटी असते. त्यात जर माहिती जातच राहिली तर नवीन गोष्टी साठवल्याच जाणार नाहीत. इथे झोप आपली अहं भूमिका पार पाडते. गाढ झोपेत मेंदूतल्या विद्युत लहरी कुरिअर सव्‍‌र्हिससारखे काम करतात. हिप्पोकॅम्पसमधल्या मेमरी फाइल्स मुबलक जागा असलेल्या कॉर्टेक्समध्ये पाठवल्या जातात. मगच त्या गोष्टी आपल्या आठवणीत पक्क्या बसतात. आपली एखादी मेमरी फाइल विस्मृतीच्या कप्प्यात गेली असेल, तर आठ तासांच्या शांत झोपेत मेंदू या फाइल्स शोधून परत आणू शकतो. शांत झोपेतून उठल्यावरचा अनुभव सांगतो, ‘‘अरे, काल मला जे आठवत नव्हतं ना ते आत्ता आठवलं पहा!’’ ही आहे झोपेची करामत.

झोप काय देते यापेक्षा ती घेतली नाही तर ती काय घेऊन जाते हे पाहणे जास्त डोळे उघडणारे ठरू शकते. अपुऱ्या झोपेचा परिणाम सगळ्यात आधी आपल्या एकाग्रतेवर होतो. तिचा पायाच डळमळतो. अशा व्यक्तीने ड्रायव्हींग केलं तर झोपेच्या दबावामुळे ती व्यक्ती मायक्रोस्लीपमध्ये जाऊ शकते. या स्थितीत काही क्षणासाठी मेंदूच्या सगळ्या संवेदना जातात. अ‍ॅक्सिलरेटर दाबायचा की ब्रेक, व्हील कुणीकडे फिरवायचं याची निर्णयक्षमता ४५ सेकंदासाठी पूर्णपणे जाते. भयानक अपघात घडतात. दारू आणि अपुरी झोप याचं एकत्र येणं तर आणखीनच भयावह. वर्तमानपत्रात रोज दिसणारे अपघातांचे फोटो पाहिल्यावर आणि ड्रायव्हरचा ताबा सुटला हे वाक्य वाचल्यावर अपुरी झोप आपल्याला मृत्यूच्या दारात नेऊन उभी करू शकते हे पुरेपूर पटतं.

अपुरी झोप आपले भावनांवरचे नियमनही घालवते. छोटय़ाशा कारणाने आपण राग, भीती, नैराश्य अशा आदिम भावनांकडे जातो. झोपेपासून वंचित असणाऱ्या माणसाच्या मेंदूत राग, भीती या भावनांच्या पायडलवर विवेकी विचारांचा ब्रेक राहत नाही, कारण मेंदूतल्या जोडण्या विस्कळीत झालेल्या असतात. कित्येक लोक आठवडय़ातले पाच दिवस चार ते पाच तासही झोपत नाहीत. आणि म्हणतात, आम्ही शनिवार, रविवारी ही उरलेली झोप भरून काढतो. पण झोपेचं बँकेसारखं नसतं. कर्ज जमा करायचं आणि मग ते भरत जायचं. दिवसभरात गोळा केलेली माहिती आठवणींच्या कप्प्यात पक्की होण्यासाठी त्या दिवशीची झोप त्याच दिवशी घ्यावी लागते. झोपेच्या योग्य काळ वेळेचे महत्त्व न समजल्यामुळे अपुरी झोप जीवन पद्धत बनली आहे. हीच आपल्याला स्मृतिभ्रंशाकडेही नेते आहे. आठ तासांच्या शांत झोपेत मेंदूत स्वच्छता मोहीम राबवली जाते. दिवसभरात तयार झालेली अमिलॉइडसारखी विषारी प्रथिने एका सिस्टीमद्वारे मेंदूतून दूर केली जातात. ही घातक प्रथिने जर नियमित झोपेद्वारे दूर केली गेली नाहीत तर त्याचे छोटे छोटे गोळे मेंदूच्या विविध भागांत साचतात. अल्झायमर होण्याचे हे एक महत्त्वाचे कारण मानले जाते.

संकटाच्या क्षणी म्हणजे जेव्हा लढा अथवा पळा अशा परिस्थितीशी आपण सामना करतो तेव्हा ‘सिम्पाथेटीक नव्‍‌र्हस सिस्टीम’ उत्तेजित होते. मग हृदय जोरात पळू लागतं, जास्त रक्त जास्त जोराने शरीरात पंप होतं, रक्तदाब वाढतो. या चेतासंस्थेला परत शांत करण्याच्या कामात रोज रात्रीची शांत झोप खूप महत्त्वाची भूमिका बजावते. जर ही शांत झोप ५ ते ६ तासांपेक्षा कमी मिळाली तर ही चेतासंस्था उत्तेजित स्थितीतच राहते. हे आपल्या शरीरासाठी हानीकारक असते. शरीराला वाटत राहतं की आपण स्ट्रेसमधून जातो आहोत. मग कॉर्टीसाॅल नावाचे द्रव्य पण हिरिरीने पुढे येते. या सगळ्याचा परिणाम असा होतो की हृदयाची गती व रक्तदाब वाढलेलाच राहतो. ही स्ट्रेस हार्मोन्स रक्त  वाहिन्यांनाही हानी पोहोचवतात. साहजिकच हृदयविकार, उच्च रक्तदाब, अर्धागवायू होण्याचा धोका कैकपटीने वाढतो.

जेव्हा शांत झोप कमी होते तेव्हा वजन वाढीस लागतं. विशेषत: पोटाचा घेर. आपली भूक नियंत्रित करणारी दोन हार्मोन्स असतात. लेप्टीन, जे पोट भरल्याचे संकेत देतं. दुसरं घ्रेलिन, जे भूक लागली हे सांगतं. अपुऱ्या झोपेमुळे लेप्टीन कमी होतं आणि घ्रेलिन वाढतं. पोट भरलेलं लेप्टीन सांगत नाही आणि घ्रेलिन सांगत राहतं की, भूक शमलेली नाही. त्यामुळे कमी झोपणाऱ्या माणसाला जेवायचं समाधान मिळतच नाही. जणू अपुऱ्या झोपेचा गुन्हा करणाऱ्याला डबल शिक्षा. जे कमी झोपतात ते दुसऱ्या दिवशी उत्साही नसतात म्हणून ते व्यायाम करत नाहीत आणि खाण्यासाठी जास्त गोड पदार्थ निवडतात. सध्या दिसत असलेल्या लठ्ठपणाचे इतर कारणांसोबतच अपुरी शांत झोप हे पण एक महत्त्वाचे कारण ठरते.

आपण जेव्हा जेवतो तेव्हा आपल्या रक्तातली साखर वाढते. इन्सुलिन नावाचे हार्मोन लगेच शरीरातल्या पेशींना हाकारून सांगते की, ‘‘तुमच्या झडपा उघडा आणि रक्तातल्या साखरेला आत घ्या. पेशी त्याप्रमाणे ऐकतात आणि रक्तातली साखर प्रमाणात राहाते. अपुऱ्या झोपेमुळे शरीरातल्या पेशी इन्सुलिनच्या हाकेला ओ देणं कमी करतात. मग त्यांच्या झडपा उघडत नाहीत आणि रक्तातली साखर वाढलेली राहते. म्हणजे अपुऱ्या झोपेमुळे येणारा लठ्ठपणा, कमी व्यायाम, जास्त गोड खायची इच्छा, शरीरातल्या पेशींनी इन्सुलिनचे न ऐकणे हे सारे काही आपल्याला रेड कारपेट अंथरून टाईप २ डायबेटिजपर्यंत घेऊन जाऊ शकतात.

कुठलाही जिवाणू किंवा विषाणू शरीरात दाखल झाला की त्याच्याशी लढायला शरीरात एक लढाऊ फौज ‘इम्युन सिस्टीम’ असते. साधारण सात तासांची शांत झोप या सैन्याला अधिक शक्तिशाली बनवते आणि नवीन कुमक तयार करते. कोरोना असो की स्वाइन फ्लू या साथींच्या वेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांमध्ये एक असते ‘पुरेशी झोप घ्या’. कुठल्याही आजाराशी लढायला ‘अंदरसे स्ट्राँग’ बनण्यासाठी ही सूचना फार महत्त्वाची आहे. या फौजेत एक बटालियन असते किलर सेलची. ही कर्करोगाच्या पेशी नामोहरम करून टाकते. हे किलर सेल सतत सज्ज ठेवायला आपल्याला पुरेशी झोप घ्यायलाच पाहिजे.

सध्या घराघरात दिसणाऱ्या अनेक आजारांच्या मुळाशी अपुरी झोप ही महत्त्वाची गोष्ट आहे याची आपल्याला जाणीव नाही. कारण आपण तिला महत्त्वच देत नाही. आपल्या जगण्याच्या रेटय़ात, रंगीबेरंगी स्क्रीन्सच्या वेडाच्या भरात आपण "झोप" या मूलभूत गरजेकडे दुर्लक्ष करतो आहोत.

 आपल्या दैनंदिन जीवनात रोजच्या धकाधकीच्या जीवनातल्या कुठल्याही कामात यश हवे असेल तर एकाग्रता हवी. ती साधण्यासाठी जीवन मोजके असावे. 
म्हणजे मोजकेच शब्द बोलावे, नियमित पावलांनीं चालावे आणि महत्त्वाचे म्हणजे कोणा एका योग्य वेळी झोपेलाही मान द्यावा. यात जणू आर्जव आहे. झोप आली असता तिचा मान राखा. तिला महत्त्व द्या. आज एकविसाव्या शतकातले विज्ञानही पुन्हा हेच सांगते आहे.

मॅथ्यूवॉकर ह्या न्यूरोसायण्टिस्टचे असे मत आहे की, ‘आता अशी वेळ आलेली आहे की इतर आजारांसाठी औषधोपचार लिहिताना डॉक्टरांनी झोपेचे पण प्रिस्क्रिप्शन द्यावे. अर्थात ते झोपेच्या गोळ्यांच्या प्रकारात नसावे.’

आत्तापर्यंत उपलब्ध असलेल्या झोपेच्या गोळ्या झोप लवकर आणतात, परंतु ही झोप नैसर्गिक झोपेसारखी नसते. आपली स्मृती, एकाग्रता, कलात्मकता वाढवणारे जे नैसर्गिक झोपेचे फायदे आहेत तेही झोप पूर्णत: देऊ शकत नाही. चांगली झोप येण्यासाठी आपण खालील गोष्टी नक्कीच करू शकतो-

* झोपेच्या वेळेत फारसा बदल करू नका. कधी उठायचे यासाठी गजर लावण्याऐवजी कधी झोपायला जायचं यासाठी लावा आणि ती वेळ पाळा.

* नियमित व्यायाम करा, पण झोपेच्या आधी दोन-तीन तास नको.

* कॉफी, चहा, चॉकलेट दुपारनंतर नको.

* दारू आणि तत्सम पदार्थ टाळा.

* रात्री उशिरा खूप जड जेवण घेऊ नका.

* झोपायची खोली शांत, पुरेशी थंड आणि अंधारी असावी. बिछाना आणि उशी आरामदायी असावी. कुठलेही इलेक्ट्रॉनिक उपकरण तिथे नसावे.

* झोपण्यापूर्वी गरम पाण्याने आंघोळ करा.

* खोलीतल्या घडय़ाळ्याचे तोंड तुमच्याकडे नसावे. झोप आली नाही तर आपण सारखे त्याकडे पाहतो आणि मग अरे बापरे इतके वाजले अजून आपल्याला झोप येत नाही, या ताणाने येणारी झोप येत नाही.

* दिवसाचा प्रकाश ही झोपेचे नियमन करणारी महत्त्वाची गोष्ट आहे. रोज अर्धा तास तरी स्वच्छ सूर्यप्रकाशात वावरा.

* रात्री आठनंतर सर्वच घरातले दिवे मंद ठेवा. सगळे स्क्रीन्स नाईट मोडवर ठेवा. टीव्ही, मोबाइल, लॅपटॉप कोणतीही स्क्रीन नको.

* बिछान्यावर पडल्यावर झोप आली नाही तर तिची वाट पाहात पडून राहू नका, अशा वेळी मोठा दिवा लावून काही वाचूही नका. ताण घालवण्यासाठी मंद संगीत ऐकणे सगळ्यात चांगले.

या वर्षीच्या जागतिक झोप दिनाचे (१३ मार्च) ब्रीदवाक्य होते, ‘बेटर स्लीप, बेटर लाइफ, बेटर प्लॅनेट.’ जे कायमस्वरूपी आपल्याला लागू आहे.   अधिक चांगले जग हवे असेल तर सुरुवात स्वत:पासूनच करायला हवी.

गेल्या आठ दिवसांतली आपल्या झोपेची पाने जरा चाळून बघा. कशी होती माझी झोप? एकदा का त्यातल्या कमतरता उमजल्या, समजल्या, आपण त्या स्वीकारल्या तर त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करता येतील. हो अगदी आजपासूनच.

आठ तासांच्या शांत, निवांत, निरामय झोपेसाठी शुभेच्छा !

🍁🍁🍁🍁🍁🍁

- डॉ प्रकाश ढोकणे नवी मुंबई

Monday, February 8, 2021

उसना उजेड

🌴🍁🌴🍁🌴🌻🌴🍁🌴🍁🌴
              
                  *🌹उसना उजेड 🌹*

      एकदा असे घडले की, एका गृहस्थाकडं त्याचा एक आंधळा मित्र गप्पा मारायला आला होता... गप्पा इतक्या रंगल्या की, अंधार कधी पडला ते त्या सद्गृहस्थाला कळलेही नाही... मग मित्र जायला निघताच त्यानं त्याच्या हाती कंदील दिला... आणि तो मित्राला म्हणाला, "बाहेर खूप अंधार पडला आहे... त्यामुळे तू हा कंदील घेऊन जा"...
     यावर तो आंधळा मित्र  म्हणाला, "अरे बाबा, मी तर असा ठार आंधळा आहे... मला अंधार आणि उजेड सारखेच... मला या कंदिलाचा काय उपयोग"…? "हा कंदील तुझ्यासाठी नाहीच... तो डोळस माणसासाठी आहे... या उजेडामुळं कुणीही वाटसरू तुझ्या अंगावर आदळणार नाही, असे "तो सद्गृहस्थ म्हणाला... हे मात्र त्याच्या आंधळ्या मित्राला पटलं... तो कंदील घेऊन चालू लागला...
     मात्र थोड्याच वेळात एक माणूस त्याच्या अंगावर आदळला... संतापानं आणि आश्चर्यानं आंधळा मनुष्य ओरडला... "अरे, अरे, काय चाललंय तुझं?... माझ्या हातातला हा पेटता कंदील तुला दिसत नाही का"?... त्यावर जास्तच आश्चर्यानं तो वाटसरू म्हणाला", अरे भाऊ, तुझा कंदील कधीच विझून गेलाय... हे तुझ्या लक्षात नाही का आलं"?...
     हे ऐकताच आंधळा मोठ्यानं हसला आणि म्हणाला, "नाही लक्षात आलं, पण मला आज एक गोष्ट मात्र कळली... "उसना घेतलेला उजेड फार काळ आपल्या उपयोगी पडत नाही"...
    म्हणून "अत् दिप भव", म्हणजेच "स्वयं-प्रकाशित व्हा"...

प्रयत्ने_वाळूचे_कण_रगडीता

#प्रयत्ने_वाळूचे_कण_रगडीता 

एक साधारण पंचाहत्तर ऐंशी वर्षे वयाचे आजोबा पहाटेचा गजर ऐकून उठतात. एकटेच राहत असतात. घरातल्या कुठल्या तरी कोपऱ्यात ठेवलेलं जडच्या जड डंबेल दोन्ही हातांनी उचलायचा प्रयत्न करतात, पण छे! अवघड असतं त्यांच्यासाठी ते. 

दुसऱ्या दिवशी पण अगदी हाच कार्यक्रम! रोज त्यांचे प्रयत्न सुरूच असतात. एके सकाळी कसंतरी ते डंबेल आजोबा दोन्ही हातांनी ओढत घराबाहेरील बागेत घेऊन येतात. एवढं केल्यानेही ते थकून तिथेच बसतात. 

मग दुसऱ्या दिवशीपासून रोजच पहाटे बागेतच ते उचलायचा प्रयत्न! आजुबाजूला राहणाऱ्या लोकांसाठी चर्चेचा आणि आश्चर्याचा विषय होतो हा! बाजूलाच राहणारी म्हातारी खोचकपणे बघत असते. 

रोज लोक त्यांना बघत असतात. कोणी हसतं, कोणाला त्यांची काळजी वाटते तर कोणाला अजुन काही. पण आजोबा सगळ्यांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष्य करून स्वतःचे लक्ष्य हळुहळू साध्य करत असतात!

आजोबांच्या अविरत डंबेल उचलायचा प्रकार पाहून एक दिवस शेजारची म्हातारी काळजीपोटी त्यांच्या मुलीला कळवते. मुलगी लगेचच येऊन बघते. तिला कळतच नाही की या वयात आपले वडील असं का वागत आहेत. ती वडीलांना समजवायचा प्रयत्न करते. पण ते काही मागे हटायला तयार नसतात! त्यांचे प्रयत्न ते सोडत नाहीत कारण इतके दिवस जे डंबेल त्यांना उचलता पण येत नव्हतं ते आता त्यांना त्यांच्या छातीपर्यंत बऱ्यापैकी उचलता यायला लागतं. 

असं करता करता एक दिवस आजोबा ते डंबेल दोन्ही हातांनी व्यवस्थित त्यांच्या डोक्याच्या वर उचलून धरतात! काय खुश होतात म्हणून सांगू! अगदी लहान मुलांसारखी ऊडी मारून आनंद व्यक्त करतात! हे पाहुन आजुबाजूच्या शेजारांच्या चेहऱ्यावरही आनंद दिसतो! तेच शेजारी जे इतके दिवस आजोबांकडे विचित्र नजरेने पाहत असतात. खोचक म्हातारी पण आनंदी दिसते. 

मग तो दिवस उजाडतो! आजोबा मुलीच्या घरी नाताळसाठी जातात. सात आठ वर्षांच्या नातीसाठी छानशी भेटवस्तु नेतात. आजोबांना बघुन नात खुश होऊन त्यांच्याजवळ जाते. म्हातारे आजोबा नातीला पटकन उचलुन घेऊन, नाताळसाठी सजवलेल्या उंच झाडाजवळ नेतात आणि नातीला सफाईदारपणे स्वतःच्या डोक्याच्या वर उंच उचलुन धरतात आणि त्यांची नात त्या झाडाच्या टोकावर सुंदरशी चांदणी लावते! आजोबांच्या डोळ्यांत अश्रूंच्या चांदण्या चमकतात!

ते पाहुन आजोबांच्या लेकीला इतके दिवस पडलेल्या कोड्याची उकल होते की आपले म्हातारे वडील इतके दिवस इतकं जड डंबेल कशासाठी उचलत होते ते आणि तिच्याही डोळ्यांत अश्रु येतात!

प्रयन्तांती परमेश्वर म्हणतात ते काही खोटं नाहीये, हो ना!

(वरील वर्णन एका जर्मन भाषेतल्या सुंदर जाहिरातीचं आहे!)

#माझी_जर्मनी_डायरी

सौ. राजश्री उपेंद्र पुराणिक

म्हातारपण काय आहे?

.      _*म्हातारपण काय आहे? समर्थानी*_ 
                   _*केलेले सुंदर वर्णन,*_

_समर्थांनी दासबोधात फार सुंदर वर्णन केलं आहे. त्यांनी ऋणानुबंध हा शब्द घातलेला हे आहे. ऋण म्हणजे कर्ज आणि बंध म्हणजे  संबध कींवा बांधला गेलेला. तर महाराज याच्यावर सांगायचे की तुमचं देणंघेणं असतं म्हणून तुम्ही एकमेकांच्या संबधात येता आणि जोपर्यंत तुमचं एकमेकाविषयी ऋण फीटत नाही तोपर्यंत आपली सुटका नाही. आपलं एकमेका विषयी काहीतरी देणंघेणं असल्या मुळे एकमेकांना मदत करुन ऋण फेडता._

म्हातारपण फार चमत्कारिक आहे. तुम्ही काहीतरी अध्यात्म करीत असाल तर तुम्हाला पुढे त्रास होणार नाही. परंतु तेच जर आपण व्यवहारातच जर राहीला तर अवघड आहे. नामस्मरण कींवा काही साधन जर तुम्ही तारुण्या पासूनच करत असाल तर पुढे तुम्हाला त्याची सवय लागते आणि मनाला एक वळण लागतं मग पुढे सुखदुःखात त्याला नामाचीच/त्या साधनाचीच आठवण राहील.

_*म्हातारपण सहन करणं फार कठीण आहे. शरीरातील  जीवन शक्ती कमी होते. बसलेले उठवत नाही. उठलेले झोपवत नाही. अंगातली कर्मशक्ती क्षीण होते. बरोबरचे लोक मरण पावतात. तेव्हा माणूस विचलित होतो.*_

म्हातारपणी जर तुम्हाला साधनेची काही सवय नसेल तर फार अवघड आहे. कारण जीवनाचा अभ्यास केला तर असे आढळते की नामसाधनाची आवड असेल तर मन लगेच नियंत्रणात येतं. तेच जर काही साधन नसेल मनावर अंकुश येणं फारच कठीण आहे.

म्हणून  भगवान श्रीरामकृष्ण नेहमी म्हणायचे एखादी कपड्याची फॅक्टरी आहे आणि त्यात कपड्याला कलर लावायला एक माणूस पूर्वी असायचा. त्याला डायिंग मास्टर म्हणतात.
त्याने एकदा कपडा रंगवला की संपलं. परत तो कपड्याचा रंग बदलता येत नाही.

तसे माणसचे वय एकदा पंन्नास पंच्चावन्न च्या पुढे गेलं की संपलं. या वयाच्या पुढे त्याला समजून पण सुधारणा करता येत नाही. आणि म्हणून लहानपणा पासूनच कींवा तारुण्यात च साधनेची आवड पाहीजे नाहीतर कठीण आहे. _माझ्या मते तारुण्याचे कींवा समजायला लागलेल्या वया पासूनच्या कर्माचं रीझलटंन्ट म्हणजे म्हातरपण आहे._

कारण जर तुम्ही नीट वागला, चांगल्या कामाची सवय कींवा साधनेचा व्यासंग जर असेल तरच शेवटी जीवन व्यवस्थित जातं. जास्त कष्ट पडत नाहीत. म्हणून जीवनात शिस्त, चांगुलपणा, साधनेची आवड, परिश्रम करण्याची वृत्ती आणि तत्परता हे गुण कामी येतात. आपण म्हणतो म्हातारपणी पैसा असल्यावर कींवा समाजात मान असल्यावर घाबरण्याचे कारण नाही पण खरं तसं नाहीये.

याचं उत्तम उदा. पुढे देत आहे. एकदा लोकमान्य पुण्याला  बंडगार्डन मध्ये फीरायला गेले होते. तेथे डॉ.भांडारकर पण आले होते. सकाळची वेळ होती. दोघांची एकमेकां कडे दृष्टादृष्ट झाली. लोकमान्यांना ते पुर्वी शिकवायला होते. लोकमान्य त्यांच्याकडे जाऊन त्यांचे पाया पडले. तेव्हा भांडारकरांनी त्यांना लगेच ओळखलं नाही. कोण रे तू असे त्यांनी विचारल्यावर मी बाळ गंगाधर टिळक असं टिळक म्हणाले. तेव्हा भांडारकर म्हणला अरे तु अत्ताच थकलास. लोकमान्य त्यावेळी ५९-६० वर्षाचे होते. ते शांत उभे राहिले. व म्हणाले आपण भाग्यवान अहात. की आपल्याला येवढं जीवन मिळालं.

तेव्हा भांडारकर म्हणाले की तु चुकतोयेस. अरे म्हातारपण सुखाचं नाही. शाररीक दुःख, मानसिक दुःख व आपल्या पोरबाळांची दुःख पण सहन करावी लागतात. आणि म्हणून महाराज नेहमी म्हणायचे की आपल्या समजत्या वयातच आपलं ध्येय ठरलेलं असावं. म्हणजे मग त्या ध्येयाच्या दृष्टीने पावलं टाकली जातात.
मग त्यामुळे माणूस सुखदुःखात पण दुःखीकष्टी होत नाही. म्हणूनच खरंतर आपणच आपले चांगले मित्र वा शत्रू आहोत. उगीच मुलाबाळांसह बायको कींवा नातेवाईकांवर आवलंबून राहणे उपयोगाचे नाही. माझा गुरु हेच माझं धेय्य असावं व त्यांनी सांगितलेले साधन हा मार्ग.

मग काय सर्व अलबेल होईल यात शंकाच नाही. भगवदगीतेत भगवंतांनी तेच सांगितलेले आहे की सतत चांगले कर्म करत रहा कींवा, तुमच्या कर्मात मला घाला म्हणजे नामात रहा म्हणजे तो खरा कर्मयोगी होय. आता निवृत्त झाल्यावर चांगले कर्म म्हणजे काय असणार तर साधन आणि जमेल तशी लोकसेवा कींवा समाज जागृती. ती कशी करायची हे ज्याच्या त्याच्या स्वभावा नुसार ठरवावे.

निंबाळ सांप्रदायाचे हे गुरुदेव रानडे होते ना, त्यांना एकाने विचारले की तुम्ही नुसते नाम घेत बसता त्यापेक्षा समाजकार्य का करीत नाही. तेव्हा ते म्हणाले की मी येवढे एका खोलीत बंदिस्त राहून जे नाम करतोय त्यामुळे माझ्या आसपास एक चांगले आवरण तयार होते व त्यामुळे लोकांच बर होत असणारच. या माझ्या साधनेने कुठे वा कुठे तरी फायदा होत असणारच. तो कुणाला व कुठे हे मात्र मी सांगू शकत नाही. पण समाजाचं भलं होत असलंच पाहीजे.

           _कारण माऊलीने म्हणल्या प्रमाणे_
    _खळांची व्यंकटी सांडो, "सत्कर्मे रती वाढो"_ 
                   असं म्हणलं आहे.

विचार करा माऊली म्हणतात की माझ्या प्रार्थनेनं जगातलं दुःख कमी होऊ देत हे खरं मागणं आहे. आणि म्हातारा जर साधनी असेल तर जिंकलं असं म्हणायला हरकत नाही.

ज्याचा अंतकाळ नामात झाला त्याने जिंकलं. असं महाराज म्हणायचे.

                     एक विनम्र चिंतन.

संदर्भ - प. पू. बेलसरे निरुपणे आणि ग्रंथभांडार.

                     ! श्री राम समर्थ !

गुरूंच्या संपर्कात का राहावे !

🟩 गुरूंच्या संपर्कात का राहावे !🟩

एक गाय गवत चरायला जंगलात जाते. संध्याकाळच्या वेळेस तिच्या लक्षात आले की, एक वाघ तिच्याकडे दबक्या पावलाने येत आहे. ती भीतीने इकडे तिकडे पळू लागली. वाघ सुद्धा तिच्या पाठीमागे धावू लागला. धावता धावता गाय एका तलावापाशी पोहचली आणि घाबरलेली गाय त्या तलावात शिरली..

वाघ देखील तिच्या पाठीमागे त्या तलावात शिरला. त्या दोघांनाही कळून चुकले की तलाव फारसा खोल नाही आणि त्यात पाणी सुद्धा कमी आहे, मात्र चिखल जास्त आहे. त्या दोघांमधील अंतर तसे कमी होते परंतु ते दोघेही काही करू शकत नव्हते.

गाय त्या चिखलात हळूहळू रुतायला लागली. वाघ तिच्या अगदी जवळ होता, परंतु तो सुद्धा त्यात रुतायला लागला होता. दोघेही अगदी गळ्या पर्यंत रुतलेली होती. दोघेही हलू शकत नव्हते.

थोड्या वेळाने गाईने वाघाला विचारले, तुझा कोणी गुरू किंवा मालक आहे का ? वाघ घुश्यात म्हणाला, मी तर या जंगलाचा राजा आहे;  माझा कोणी मालक नाही;  मीच ह्या जंगलाचा मालक आहे. गाय त्याला म्हणाली परंतु तुझी शक्ती तुला याक्षणी काहीच उपयोगाची  नाही.
 वाघ गायीला म्हणाला की, तुझे हाल देखील माझ्या सारखेच आहेत की. तेव्हा गाय त्याला हसून म्हणाली, बिलकुल नाही माझा मालक मला संध्याकाळ झाली अजून आली नाही म्हणून शोधत येईल आणि या चिखलातून मला काढून घेऊन जाईल.
थोड्या वेळाने खरंच एक माणूस आला आणि गायीला चिखलातून बाहेर काढून घरी घेऊन गेला. जाताना गाय आणि मालक एकमेकांकडे कृतज्ञतेने पहात होते, त्यांच्या मनात असून सुद्धा ते वाघाला बाहेर काढू शकत नाही कारण त्यांच्या जीवाला धोका होता.

कथेतून बोध हाच की,
गाय हे समर्पित हृदयाचे प्रतीक आहे.
वाघ हे आपले अहंकारी मन आहे.
मालक हे गुरू व ईश्वराचे प्रतीक आहे, तर चिखल हा संसार आहे आणि संघर्ष ही  अस्तित्वाची लढाई आहे.
कोणावर निर्भर असणे चांगली गोष्ट नाही, परंतु मीच श्रेष्ठ आहे, मला कोणाची मदतीची गरज नाही, हाच अहंकार विनाशाचे बीज रोवतो....

▬▬▬▬ ஜ۩۞۩ஜ ▬▬▬▬

Sunday, February 7, 2021

मानसिक आजार पळवुन लावणार्‍या चौदा कृती

=====
मानसिक आजार पळवुन लावणार्‍या चौदा कृती

कसल्याही प्रकारच्या निराशेला नाहीशी करणारी चौदा सुत्रे 

1) सतत पॉझीटीव्ह -
कितीही वाईट घडो, नेहमी पॉझीटीव्हच रहायचं!
उदा. “एक डोळा गमावला पण दुसरा डोळा शाबुत आहे,” ज्यामुळे मी हे सुंदर जग पाहु शकतो, देवाची किती कृपा आहे.
प्रत्येक अपयश मला एक संधी देऊन जात आहे.
उदा. जेव्हा लोक आपल्याला टाळतात, आपल्याकडे बघुन नाकं मुरडतात, तेव्हा तर अधिकधिक आकर्षक दिसण्याबद्द्ल, आपण जागरुक होतो.
आपली मस्करी उडवली की, आपला कोणी कळत नकळत अपमान केला की, आपल्यातल्या महत्वकांक्षा जागृत होतात.

2) पॅशन निर्माण करा - 
आयुष्यात पोकळी आणि निराशा आली की एक असं पॅशन शोधावं, ज्यासाठी संपुर्ण आयुष्यच पणाला लावावं.
पॅशन म्हणजे अशी एखादी गोष्ट जी गोष्ट न थकता, अगदी उत्साहाने, महिन्याचे तीस दिवस, दिवसातल्या दहा-बारा तासाच्या वर आपण ते करु शकतो, ह्याला म्हणतात पॅशन!
त्या गोष्टीसाठी अक्षरशः आयुष्य झोकुन द्यावं. अगदी स्वतःला विसरायला लावतं, तेच खरं पॅशन!
कोणासाठी व्यापार हे पॅशन असेल, कोणासाठी खेळ हे पॅशन असेल, कोणासाठी भटकंती हेच पॅशन असेल.
त्याच्याशिवाय आपण जगु शकत नाही, आणि मग एके दिवशी जगही आपल्याला त्या एकाच गोष्टीसाठी ओळखु लागतं.
सचिन-क्रिकेट, धीरुभाई-रिलायन्स, अमिताभ-एक्टींग, लता मंगेशकर-गायन, मोदी-नेतृत्व, पटनायक-वाळुची शिल्पे, प्रकाश आमटे-आनंदवन, श्रीश्री रविशंकर गुरुजी – आर्ट ऑफ लिविंग, स्टीव्ह जॉब्ज-गॅझेट्स,
ह्या यादीत आपलंही नाव येऊ शकतं, आपणही आपल्या पॅशनसाठी वेडं बनलो तर!

3) महिन्याला दोन पुस्तके - 
माझ्या आयुष्यातल्या अत्यंत वाईट आणि पडत्या काळामध्ये मला फक्त आणि फक्त चांगल्या विचारांच्या पुस्तकांनीच तारलं, नाहीतर कदाचित मी आज हा लेख लिहायला शिल्लकच राहीलो नसतो, इतके पुस्तकांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत.
महिन्याला कमीत कमी दोन तरी चांगली पुस्तके तरी वाचुनच काढेन आणि त्यातल्या चांगल्या गोष्टी तात्काळ जीवनात आणेन, हा चंगच बांधावा, आपोआप जे जे हवे ते सारे मिळत जाते, हा माझा स्व-अनुभव आहे.

4) डायरी लिहा - 
दररोज घडलेल्या बर्‍या वाईट घटना आपल्याला बहुमुल्य अनुभव देऊन जातात, त्यांना शब्दबद्ध करत गेलं की जगण्याची रंगत वाढत जाते.
माझ्या मनात चाललेले द्वंद बाहेर काढण्यासाठी मला ह्या डायर्‍यांनी खुप मदत केली. झालेले अपमान, आलेले अपयश, भविष्याच्या चिंता, मनाचं रिकामपण, सगळी मळमळ मी बाहेर काढली, आणि प्रत्येक जखम डायर्‍यांमध्ये जपुन ठेवली, आणि शहाण्या बाळांसारखं त्या सर्वांनीही मला त्रास देणं बंदच करुन टाकलं.
आजही माझ्या कॉम्पूटर मध्ये मी स्वतःलाच लिहलेली शेकडो पत्रं आहेत, जी वाचुन मला आता खुप गंमत वाटते. कधी छोट्यामोठ्या कारणाने मी खचलो की ते वाचुन प्रचंड बळ मिळतं. बॅटरी पुन्हा टणाटण चार्ज होते.

5) जे सुरु केलंय त्याचा शेवट करा - 
हातात घेतलेलं काम पुर्ण करायचं म्हणजे करायचं! मनावर विजय मिळवण्यासाठी मनाचाच वापर करायचा, काम सुरु होतानाच असं भासवायचं की ते पुर्ण झालेलं आहे, आणि मन गोंधळुन जातं आणि ते पुर्ण करुनच एका जागेवर शांत बसतं!
‘आसान है’ हा यशाचा मुलमंत्र नेहमी लक्षात ठेवायचा!

6) कंफर्ट झोन तोडा. नवी आव्हाने स्वीकारा - 
तु मागच्या एक महिन्यामध्ये अशी कोणतीही एक गोष्ट केलीस का, जे तुला येत नाही, जे करण्याची तुला भिती वाटते?

7) कमीत कमी तीस मिनीट व्यायाम - 
मनाला ताजंतवाणं ठेवण्याचा हुकुमी एक्का आहे, शरीराला व्यायाम करायला भाग पाडायचं, मन आपोआप ताळ्यावर येतं! जगातल्या प्रत्येक यशस्वी व्यक्तीला हे सुत्र माहित आहे.

8) ध्यान, सर्व समस्यांवर रामबाण उपाय - 
तुझं शारीरीक व्यंग हे तुझ्या आयुष्यात कधीही अडथळा बनु शकत नाही, कारण तु म्हणजे तुझं शरीर नाहीस!
खरा तु तर वेगळाच कोणीतरी आहेस, हे तुला ध्यान करायला लागलं की आपोआप उमगत जाईल.
आतापर्यंत केला नसशील तर एकदा आर्ट ऑफ लिविंगचा हॅपिनेस कोर्स नक्की कर.

9) महिन्याला एक वाईट सवय सोडा - 
आपल्या प्रत्येकामध्ये वाईट सवयी असतात, मी एका महिन्याला एक वाईट सवय सोडायची आहे, आणि एक चांगली सवय जोडायची आहे, असं प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला अंतर्मनाला सांगतो. महिनाभर त्याची कसोशीने अंमलबजावणी करतो.

10) आपल्या आजुबाजुला प्रसन्नतेचा शिडकावा करा - 
घरातुन बाहेर पडण्याआधी एकदा आरशात बघुन स्वतःलाच वचन देतो की आज माझ्या संपर्कात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला मी आनंद आणि प्रसन्नता वाटणार आहे. प्रत्येकाच्या चेहर्‍यावर हसु फुलवणार आहे.
कधी एखाद्या उपाशी माणसाला पोटभर खावु घालावं, कधी एखाद्या लहान मुलाशी लहान बनुन खेळावं! कधी रस्त्याने जाताना कोणाला लिफ्ट द्यावी, कधी जोक्स सांगुन लोकांना खळखळुन हसवावे.

11) जे मिळालयं त्याबद्द्ल कृतज्ञ रहा -
जो कृतज्ञ आहे, त्यालाच ब्रम्हांड अजुन जास्त भरभरुन देतं, हेच सिक्रेट आहे. आपल्याला मिळालेल्या दहा वरदानांबद्द्ल रोज मनःपुर्वक आभार व्यक्त केल्यास आयुष्यातली सगळी दुःखे आपोआप नाहीशी होतात, याचा मी स्वतः अनुभव घेतला आहे.

12) यशस्वी लोकांसोबत मैत्री करा - 
असे लोक ज्यांनी स्वतःचा ठसा ह्या जगात उमटवला आहे, त्यांच्याशी अधिकाधिक ओळखी कराव्यात, त्यांच्याशी भेटण्याच्या संधी शोधाव्यात. यश ही उत्साहासारखं संसर्गजन्य असतं!

13) सुरक्षित अंतर ठेवा - 
जे लोक आपलं मानसिक खच्चीकरण करतात, आपली टर उडवतात, अशा लोकांपासुन चार हात दुर रहावे. निगेटीव्ह लोकांना आपल्या आयुष्यात आणि आपल्या मनात कुठेही स्थान देऊ नये.

14) तीस दिवसांचा प्लान - 
पुढच्या तीस दिवसात मी काय करणार आहे, ह्याचा प्लान महिन्याच्या सुरुवातीला तयार करुन भिंतीला चिटकवुन टाकावा.
एकेक लक्ष्य साध्य केलं की ‘विजयी’ असं लिहुन त्याचं अगदी उत्साहाने आणि आनंदाने ‘सेलिब्रेशन’ करावं....!!!!

।। सर्वे सन्तु निरामयः ।।
=====

सदर लेख सोशल मीडिया वरून कॉपी पेस्ट केला आहे, मूळ लेखकाला सलाम  🙏

Friday, February 5, 2021

काशी येथील अन्नपूर्णा

CP ▶️

 काशी येथील अन्नपूर्णा 

▫️अन्नपूर्णेचे महत्त्व........

🙏🕉️🙏

 अन्नपूर्णा या देवतेला एक अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. विशेषतः मी दत्तसंप्रदायात असल्यामुळे जेव्हा श्रीदत्ताला नैवेद्य दाखवला जातो ,त्यानंतर लगेच अन्नपूर्णेलाही दाखवला जातो. मला हे नेहमी कोडं पडायचे की अन्नपूर्णेला एवढे महत्त्व का दिले जाते.शेवटी मी अन्नपूर्णे संबंधी जेवढी माहिती मिळेल ती सर्व मिळवण्याचा प्रयत्न केला. यासंबंधी शंकर पार्वतीची कथा प्रसिद्ध आहे. अन्नाचे एवढे महत्त्व श्री शंकराला ही मान्य नव्हते. दोघांचा वाद झाला आणि पार्वती रुसून निघून गेली. पार्वती म्हणजे प्रत्यक्ष अन्नपुर्णाच. तीच निघून गेल्यामुळे जगात सर्वत्र हाहा:कार माजला. अन्न नसल्यामुळे लोकांचे हाल सुरू झाले शेवटी पार्वतीलाच दया आली आणि ती अन्नपूर्णेच्या स्वरूपात काशीला अवतीर्ण झाली. तिने अन्नदान सुरू केले. भगवान श्रीशंकरालाही मधली सगळी परिस्थिती अनुभवाला आल्यामुळे अन्नाचे महत्त्व समजले आणि ते स्वतः कटोरा घेऊन पार्वतीकडे भिक्षा मागायला आले. अन्नपूर्णेचे पहिले मंदिर त्यामुळेच काशीला आहे.
               जीवनात अन्नाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. समस्त प्राणीमात्र अन्नाशिवाय जगू शकत नाहीत. अन्न शरीराला शक्ती पुरवते आणि जीवनाची नवी उमेद सतत देत राहते. अन्न खाल्ले की शरीराला एक प्रकारचे समाधान मिळते .म्हणूनच अन्नदानाला अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले आहे. ते अन्न सुग्रास असले पाहिजे. अन्न  बनवणाऱ्याची मनस्थिती समाधानी असली पाहिजे. त्यांनी ते अन्न समाधानानी बनवले असले पाहिजे. तेच पदार्थ घेऊन वेगवेगळ्या लोकांनी बनवलेल्या अन्नाची चव वेगवेगळी असते. याचे कारणच हे की अन्न बनवणाऱ्याच्या वासना आणि मनस्थिती त्या अन्नात उतरत असते. म्हणून घरच्या अन्नपूर्णेला नेहमी समाधानात ठेवले गेले पाहिजे. तिने शुचिर्भूत होऊन अन्न शिजवले पाहिजे.आपल्याकडे मुलीला सासरी जाताना अन्नपूर्णेची मूर्ती त्यासाठीच दिली जाते. तिने अन्नपूर्णेची सेवा , उपासना करून, उत्तम अन्न कुटुंबियांना खायला घालून कुटुंब सुखी करावे अशी अपेक्षा त्यामागे असते.
               मध्यंतरीच्या काळामध्ये मी मुद्दाम अन्नपूर्णेची उपासना केली आणि मग लक्षात आले की नुसती उपासना उपयोगी नाही .तिची प्रत्यक्ष सेवा केली पाहिजे. म्हणून मी स्वतः वेगवेगळे पदार्थ बनवण्यास सुरुवात केली आणि कोणताही पूर्वानुभव नसताना सुद्धा ह्या सर्व पाककृती अतिशय छान सराईतासारख्या केल्या गेल्या.जणू अन्नपूर्णादेवीच माझ्या हातातून काम करत होती.       
               आपल्या अनेक वासना या अन्नाद्वारे पूर्ण होत असतात .मी पुष्कळ संन्याशीहि असे पाहिले आहेत की ज्यांच्या वासना अन्नात अडकून बसलेल्या असतात. खाण्याच्या अनेक इच्छा अपूर्ण असतात. शरीर आहे तिथे वासना असणारच. त्या पूर्ण झाल्याशिवाय संपत नाहीत. मित्रमंडळ जमा करून चिवड्याचा ढीगच्या ढीग फस्त करताना कसा आनंद मिळतो हे अनेकांनी अनुभवले असेल. शेवटी जीवन हे आनंद निर्मिती साठीच आहे .छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा खूप आनंद भरला आहे, परंतु आपल्याला त्याची कल्पनाच नसल्यामुळे तो आनंद आपण घेत नाही.
               अन्नामुळे शरीरात चैतन्य उत्पन्न होते .अगदी शरीर सोडल्यानंतर सुद्धा या चैतन्याची आवश्यकता लिंग देहाला असते. उत्तम अन्न हे शरीराला समाधान प्राप्त करून देते. शुचिर्भूत होऊन आनंदी वृत्तीने स्वयंपाक करण्याची आवश्यकता आहे आणि ते वातावरण घरातल्या सर्व लोकांनी निर्माण करून द्यावे. त्या अन्नात प्रेम असते. म्हणूनच आईच्या हातचे अन्न आपल्याला सगळ्यात गोड वाटते. केलेला स्वयंपाक हा आपण प्रत्यक्ष परमेश्वरासाठी करतो ही भावना करून जर केला तर तो अतिशय उत्तम होतो.म्हणूनच नैवेद्याचे अन्न हे अतिशय चविष्ट असते .उत्तम संसार करून सर्व प्रकारच्या वासना भोगून पूर्ण केल्या पाहिजेत. तेव्हाच माणूस परमेश्वर चिंतनाकडे वळू शकतो. असमाधानी माणूस ध्यानधारणा करू शकत नाही. आपले सर्व ऋषी-मुनी हे विवाहित दाखवले आहेत आणि सर्व प्रकारचे भोग भोगून वासनाक्षय करूनच ते पूर्णत्वाला पोहोचले आहेत. 
म्हणूनच शंकराचार्य म्हणतात--
अन्नपूर्णे सदापूर्णे |
शंकरप्राण वल्लभे |
ज्ञान वैराग्य सिध्यर्थं |
भिक्षांदैहि च पार्वती ||
ग्रूपमधील सर्व अन्नपूर्णाना  समर्पित ...
            संकलन ▫️
    📚     ग्रंथ दर्शन

पापाचा जनक कोण असतो?

एका राजाने आपल्या दरबारात सभासदांना विचारले कि पापाचा जनक कोण असतो? पण उत्तर मिळाले नाही. राजाने आपल्या राजगुरुंकडे मान वळविली. ते परमज्ञानी होते. पण तत्काळ त्यानाही काही उत्तर सुचले नाही. राजाने त्यांना उत्तर देण्यासाठी एका आठवड्याचा काळ दिला. बऱ्याच चिंतन-मननानंतर राजगुरुना उत्तर मिळाले नाही. अशाप्रकारे सहा दिवस गेले. राजगुरू घाबरले त्यांनी भीतीपोटी राजधानी सोडली. चालत चालत एका गावात पोहोचले. तेथे एका घराच्या कट्ट्यावर विश्रांतीसाठी बसले. ते घर एका गणिकेचे (वैश्येचे) होते. राजगुरुंची हि दमलेली अवस्था पाहून तिने त्यांच्याशी चर्चा सुरु केली. राजगुरूने तिला आपली सर्व कथा ऐकवली. गणिका म्हणाली," तुमच्या प्रश्नांचे उत्तर माझ्याकडे आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला माझ्याकडे यावे लागेल. " हे ऐकताच राजगुरू म्हणाले, "तुझ्या सावलीतही पाप वाटते तेंव्हा तुझ्या घरी कसा येवू?" गणिका म्हणाली, " आपली इच्छा! परंतु ब्राह्मणाला दक्षिणा देणे हे मोठे पुण्याचे काम आहे आणि दारी आलेल्याला तर दक्षिणा दिल्याशिवाय मी जावू देणार नाही!" असे म्हणून तिने राजगुरुना सोन्याच्या दोन मोहोरा दिल्या. मोहोरा पाहून राजगुरू नरम झाले. तिच्या घरी आले, जेंव्हा तिने पाणी दिले तेंव्हा त्यांनी ते नाकारले पण तिने चार मोहोरा दिल्या तेंव्हा त्यांनी पाणीही पिले आणि अश्याच रीतीने जेवणही केले. तेंव्हा गणीकेने राजगुरुना सुनावले, "पापाचा जनक कोण असतो याचे उत्तर आता तुम्हाला मिळाले का?, तर पापाचा जनक आहे लोभ." राजगुरू निरुत्तर झाले पण त्यांना राजाच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. 

तात्पर्य- कर्म आणि भाग्य यापेक्षा अधिक मिळवण्याची लालसा (लोभ) सदैव पापकर्म घडवीत असते...

Thursday, January 28, 2021

गोत्र म्हणजे काय !

।। गोत्र म्हणजे काय !............ 

तर गोत्र म्हणजे🙏

।। धार्मिक विधी करताना बर्याच वेळा आपले गोत्र काय 
।। असा प्रश्न गुरुजी विचारतात तेंव्हा गोत्र म्हणजे काय 
।। असा प्रतिप्रश्न करणारे देखिल असतात अशा वेळेला 
।। पुर्वजांपैकी कोणी एक पुरुष असे उत्तर देउन वेळ 
।। मारुन नेणारे काही जण असतात. पण तसे नसून 
।। गोत्र ही वेद्यीक धर्माने दिलेलि देणगी आहे. जन्मवंश 
।। शास्त्रदृष्ट्या अतंत्य सूक्ष्मस्तरीय एक मानवशाखा आहे 
।। " धर्मसिंधु " ग्रंथामध्ये गोत्राचे लक्षण पुढील प्रमाणे 
।। दिलेले आहे 

।। 'तत्र गोत्र लक्षणम् - विश्वामित्रो जमदग्निर्भरद्वाजो 
।। थ गौतमः । अत्रिर्वसिष्ठः कश्यप इत्येते सप्तऋष्यः ॥ 

।। विश्वामित्र, जमदग्नि, भरद्वाज, गौतम, अत्रि, वसिष्ठ, 
।। आणि कश्यप हे सात ऋषी आहेत. व आठवे ऋषी 
।। अगस्त्य हे होत. यापैकी प्रत्येक ऋषीचे आपत्य 
।। म्हणजे गोत्र होय. गोत्रांची संख्या अगणीत असली 
।। तरी धर्माने त्यांची व्यवस्था सुलभ व्हावी म्हणून 
।। त्यांची विभागणी पन्नास गणामध्ये केलेली आहे. 
।। त्या त्या ऋषीं च्या नावांना गोत्र असे म्हणतात.

।। प्रमुख गोत्र व त्यांची प्रवरे !............

१ अत्रि :- आत्रेय - आर्चासन - श्यावाश्व
२ अघमर्षण :- वैश्वामित्र - अघमर्षण - कौशिक
३ आंगिरस :- आंगिरस - आंबरीष - यौवनाश्व
४ आयास्य :- आंगिरस - आयास्य - गौतम
५ आर्ष्टिषेण :- भार्गव - च्यावन - आप्न्वन - आर्ष्टिषेण - अनूप
६ उपमन्यु :- वासिष्ठ - इंद्रप्रमद - आभ्रद्ववसु
७ कण्व :- आंगिरस - आजमीढ - कण्व
८ कपि :- आंगिरस - आमहीयव - औरुक्षयस
९ काश्य्प :- काश्य्प - अवत्सार - नैधृव( काश्य्प ) - अव्त्सार - असित
१० कुत्स :- आंगिरस - माधांत्र - कौत्स
११ कौंडिण्य :- वासिष्ठ - मैत्रावरुण - कौंडिण्य
१२ कौशिक :- वैश्वामित्र - अघमर्षण - कौशिक
१३ गार्ग्य :- आंगिरस - शैन्य - गार्ग्य
१४ जामदग्न्य :- भार्गव - च्यावन - आप्न्वन - और्व - जामदग्न्य
१५ नित्युन्द :- आंगिरस - पौरुकुत्स्य - त्रासदस्यु
१६ नैध्रुव :- काश्य्प - अव्त्सार - नैध्रुव
१७ पाराशर :- वासिष्ठ - शाक्त्य - पाराशर
१८ बादराण :- आंगिरस - पौरुकुत्स्य - त्रासदस्यु
१९ बाभ्र्व्य :- वैश्वामित्र - देवरात - औदास
२० बिद :- भार्गव - च्यावन - आप्न्वन - और्व - बिद
२१ भारव्दाज :- आंगिरस बार्हस्पत्य - भारव्दाज 
२२ मित्रायु :- भार्गव - च्यावन - देवोदास
२३ मुद्ग् गल :- आंगिरस - भार्ग्याश्व - मौद्ग्गल्य
२४ यस्क :- भार्गव वैतहव्य - सावेतस
२५ रथीतर :- आंगिरस - वैरुप - रथीतर
२६ वत्स :- भार्गव - च्यावन - आप्न्वन - और्व - जामदग्न्य
२७ वासिष्ठ :- वासिष्ठ - इंद्रप्रमद - आभ्रद्ववसु
२८ विष्णुवृद्ध :- आंगिरस - पौरुकुत्स्य - त्रासदस्यु
२९ वैश्वामित्र :- वैश्वामित्र - अघमर्षण - कौशिक
३० शांडिल्य :- शांडिल्य - असित - देवल
३१ शालाक्ष :- वैश्वामित्र - शालंकालय - कौशिक
३२ शौनक :- भार्गव - शौनहोत्र - गार्स्तमद 

।। प्रवर म्हणजे काय !.............

।। गोत्रांची संख्या अगणीत असली तरी धर्माने त्यांची 
।। व्यवस्था सुलभ व्हावी म्हणून त्यांची विभागणी 
।। पन्नास गणामध्ये केलेली आहे. प्रत्येक गोत्रांना 
।। प्रर्वतक ऋषी असतात. काही गोत्रांना एक, काही 
।। गोत्रांना दोन, काही गोत्रांना तिन ते पाच पर्यंत प्रवर्तक 
।। असतात या प्रवर्तक ऋषी गणांना (प्रवर) असे म्हणतात
।। काही समाजामध्ये आजही सप्रवर विवाह वर्ज केला 
।। जातो. तसेच उपनयन प्रसंगी बटूस गोत्र प्रवर ,
।। स्वतःची वेदशाखा, सूत्र, स्वतःचे नक्षत्र व चरण नाम 
।। ह्यांची माहीती करुन दिले जाते.

।। ही माहिती शेयर करण्याचे कारण म्हणजे आपले 
।। पूर्वज आणि आपली हिंदू संस्कृती किती संपन्न होती 
।। ह्याचे हे छान उदाहरण आहे. 

।। जेनेटिक्सचा अभ्यास करणाऱ्यानी हे मान्य केलेले 
।। आहे की एका गोत्रात लग्न केल्यामुळे अनेक आजार 
।। ( जेनेटिकली ट्रांसमिटेड डिसीज ) होऊ शकतात 
।। आणि आपल्या पूर्वजानी जे नियम घालून दिले 
।। आहेत ते योग्य आहेत. यातील बऱ्याच गोष्टीची उकल 
।। जेनेटिक्सवाले आता करत आहेत. 
।। आपली हिंदू संस्कृती अतिशय पुढारलेली आहे .

Saturday, January 23, 2021

कुणी कुणाचेच नाही

*नेहमी लक्षात ठेवा*
*कुणी कुणाचेच नाही*

सीतेचे रखवालदार प्रभू श्रीराम होते   
जेव्हा हरण झाले तेव्हा  कोणी नव्हते.

राजा दशरथला चार पुत्ररत्न ह़ोते;
जेव्हा प्राण गेला तेव्हा कोणी नव्हते

लंकेचा राजा रावण पण शक्तिशाली होता;
पण लंका जाळली तेव्हा कोणी नव्हते

श्रीकृष्ण भगवान सुदर्शनधारी होते ;
जेव्हा बाण लागला तेव्हा कोणी नव्हते,

लक्ष्मण पण एक तरबेज योद्धा होते;
पण शक्ति लागली तेव्हा कोणी नव्हते,

शरशय्या वरती भीष्म पितामह होते;
वेदनेचे भागीदार कोणी ही नव्हते 

राजपुत्र अभिमन्यु सर्वांचे लाडके होते ;
पण चक्रयुव्ह मधून काढण्या साठी कोणी नव्हते,

सर्वां साठी,त्रिकाल बाधीत सत्य हेच आहे, 
या जगात आपले कोणी ही नाही.

ज़े विधात्याने लिहिले,आणि जसे आपले कर्म आहे,त्या पुढे कोणी जाऊ शकत नाही.

*जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर*  हेच सत्य आहे.

*केवळ कर्मच आपले आहे*       
     *देवापेक्षा कर्माची* 
      *भिती  बाळगावी,*
   *एक वेळ देव माफ करील पण कर्म नाही.*
*फुंकर मारून आपण दिवा विझवु शकतो, पण अगरबत्ती नाही. कारण ज्याचे कर्तृत्व दरवळते त्याला कोण विझवु शकत नाही..*

*🙏🏾🙏🏾*

Thursday, January 14, 2021

नैवेद्य म्हणजे काय? तो कसा दाखवावा?

*नैवेद्य म्हणजे काय? तो कसा दाखवावा?*

देवाला निवेदनीय असे जे द्रव्य ते द्रव्य म्हणजे नैवेद्य होय. म्हणजे ईश्वराला अर्पण करता येण्यासारखी, त्याला देता येण्यासारखी खाद्य वस्तू, खाद्य पदार्थ म्हणजे नैवेद्य असे आपण म्हणू या.

नैवेद्य हा पाच प्रकारचा असावा.
‘‘नैवेदनेय असेल ते प्रशस्त आणि पवित्र असावे. ते भक्षणाला योग्य असावे आणि पाच प्रकारचे असावे. त्यालाच ‘नैैवेद्य’ म्हणतात.
भक्ष्य – गिळता येण्यासारखे,
भोज्य – चावून खाता येईल असे,
लेह्य – चाटता येईल असे,
पेय – पिता येईल असे आणि
चुष्य – चोखता येईल..
असे ते पाच प्रकार आहेत.
असा हा पंचविध नैवेद्य देवाची पूजा करूनै त्याला समर्पावा.’’

तंत्रासारातील मूळ श्लोक पुढीलप्रमाणे-
नैवेदनैय यद द्रव्यं,
प्रशस्तं प्रयतं तथा
तद भक्ष्यार्हम पंचविधं
नैवेद्यमिति कथ्यते।
भक्ष्यं, भोज्यं च लेह्यं च,
पेयं चुष्यं च पंचममे
सर्वत्र चैतनैवेद्यमाराध्यास्यै नैिवेदयेत

विष्णूला दुधभात,
शिवाला दहीभात,
गणपतीला मोदक अथवा गूळखोबरे,
सूर्याला गूळभात आणि
देवीला सांजा (तिखट सांजा नैाही. गोडाचा सांजा म्हणजेच शिरा.) किंवा श्रीखंड प्रिय आहे.
दूध आणि फळे सर्व देवांना प्रिय आहेत.

नैैवेद्य कसा दाखवतात?
»  नैवेद्य दाखवताना देवापुढे चौकोनी मंडळ करून त्यात पुनः ७ असे चिन्ह करून मग त्याच्यावर नैवेद्याचे ताट, भांडे, पात्र ठेऊनै मग नैवेद्य दाखवावा.
»  या पात्रावर तुलसीपत्र ठेऊन मगच तो नैवेद्य देवाला अर्पण करावा.
»  तुलसीपत्र ठेवले की, ‘माझा यावरचा अधिकार संपला आहे आणि आता हे पूर्णत: तुझे आहे’, हा भाव व्यक्त होतो आणि आपला अधिकार संपतो.
»  सोन, रूपे, तांबे, दगड, कमलपत्र आणि यज्ञीय लाकूड यापैकी एका पात्रात ठेऊन नैवेद्य दाखवावा असे सांगितले गेलेले आहे.
»  नैवेद्य देवाच्या उजव्या हाताला ठेवावा. डाव्या हाताला ठेवल्यास तो अभक्ष्य म्हणजे खाण्यास अयोग्य होतो.
»  तुलसीपत्र, दुर्वा किंवा पुष्प यांनी नैवेद्याचे प्रोक्षण करावे. म्हणजे यांनी नैवेद्यावर पाणी शिंपडावे म्हणजे नैवेद्य शुद्ध आणि दाखवण्यास, अर्पण करण्यास योग्य होतो.
»  मग नैवेद्याचे पात्राभोवती डावीकडूनै उजवीकडे असे आपल्या उजव्या हाताने पाणी सोडत मंडल करत यावे.
»  नंतर "ॐ प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा’’ असे म्हणत म्हणत नैवेद्याचा घास देवाच्या मुखाकडे न्यावा. त्यावेळी आपला डावा हात आपल्या हृदयाजवळ असावा, मान झुकलेली असावी. असे करून झाले की, ‘मध्ये पानयं समर्पयामि’ असे म्हणून उदक द्यावे. म्हणजे पाणी द्यावे म्हणजे पाणी जवळ न्यावे अथवा ताम्हनात सोडावे.
मग पुन्हा वरचा हा ‘स्वाहा’ मंत्र म्हणत म्हणत ज्या देवतेला तो नैवेद्य दाखवायचा असेल त्या देवतेचे नाव घेत (इथे विशिष्ट देवतेचे नाव घेत नसल्याने मी अमुक देवताभ्यो म्हणत आहे) ‘अमुक देवताभ्यो नैम: नैवेद्यं समर्पयामि’ असे म्हणावे आणि ताम्हनात उदक सोडावे. [उदक म्हणजे पाणी] महानैवेद्य हा पुरण, वरण, पक्वान्न ,भाज्या, कोशिंबिरी इत्यादी असावा.
नैवेद्य दाखवून झाल्यावर देवाची आरती करावी.
नैैवेद्य दाखवून झाला की जो पदार्थ असेल त्याचे ‘प्रसादात’ रूपांतर होते. त्यामुळे मी देवाला प्रसाद दाखवतो आहे असे म्हणता येत नाही तर मी देवाला नैवेद्य दाखवतो आणि तुला त्याचा प्रसाद देतो हे योग्य आहे. देवाला नैवेद्य दाखवून झाल्यावर आपण तो लगेच स्वत:ही खाऊ नये आणि इतरांना लगेच वाटू सुद्धा नये.
थोडा वेळ तो देवापुढे तसाच ठेवा. हां, पण झुरळे, पाली, उंदीर, माशा, मुंग्या यांचा त्याला उपद्रव होत नाही ना हे पाहणे अगत्याचे आहे हे सांगायला नकोच.
आपल्याला प्रत्यक्ष नैवेद्य दाखवता येत नसेल तर आपण मानस पूजा करून त्यामध्ये आपल्याला हवा तो नैवेद्य प्रभूला अर्पण करू शकतो आणि या मानस पूजेमध्ये प्रचंड शक्ती आहे. अगदी प्रत्यक्ष पूजेपेक्षाही. कारण आपण त्यावेळेला देवाशी पूर्णत: एकरूप होऊनै जातो.
मनाला प्रयत्न करून मानस पूजेचे चित्र रंगवावे लागते आणि मनाला मग हळूहळू असा हा शांतीरूप आकार यायला लागतो आणि मग आपले जीवन पवित्र, सुगंधी बनून जाते.
आपला देह हा देवाचे मंदिर होतो आणि आत आत्मा परमेश्वर आहे हे कळायला लागते.

--
सचिन जोग