Wednesday, November 3, 2021

From a small village in Andhra Pradesh to founding a $17 billion pharma company

From a small village in Andhra Pradesh to founding a $17 billion pharma company

A Mega-Thread on the story of an Indian billionaire scientist: Murali Devi of DivisLabs

1) Murali Divi belongs from Machilipatnam, a small town in Andhra Pradesh.
2) He comes from a very humble family background. His father ran the family of 14 on a narrow allowance of just ₹10,000 per month.
3) After completing his doctorate in pharmaceutical sciences from Andhra's Kakatiya University, he spent a few years in the US. 
4) Divi failed his intermediate exams (the equivalent of higher secondary) twice due to weak English.
5) However, instead of giving up, Divi doubled down and grabbed the opportunity to go to the US as a pharmacist instead of becoming a chemist like his elder brothers.
6) When Divi left India for the states in 1976, he was 25 years old with just $7 in his hands.
7) From there, he went on to draw a salary of $65,000 a year at US companies like Trinity Chemical and Fike Chemical.
8) He would soon come back to India with his wife and children with $40,000 and no plans.
9) In 1984 he teamed up with Kallam Anji Reddy to build Cheminor, which later in the year 2000 got merged with Dr. Reddy’s Laboratories.
10)To turn it around, Reddy and Murali Divi took over Cheminor, an ailing contract manufacturing company.
11)The idea was generated for Cheminor to be the contract manufacturing arm of Dr. Reddy, while Dr. Reddy’s concentrated on generics and drug discovery.
12)But reviving Cheminor was an improbable order. The company possessed only a few chemical reactors.
13)The equipment present was used to produce APIs, which were churning outdated products.
14)Divi took charge and stepped in as a managing director, hired a fresh crew of graduates, and trained them in the chemistry skills required to revive the firm.
15)His team included chemists who worked on developing a cost-effective manufacturing process for the API, ibuprofen.
16)A year later, the team had set up a production line which was soon scaled up to 1,200 metric tonnes catering to 25 % of the global demand for the compound.
17) On an ordinary day, Murali Divi would show up at 7:30 in the morning at his office in Hyderabad, work continuously till lunch, and then spend the entire day at the manufacturing plant to monitor the production line.
18)He would sometimes remain at the plant till midnight, ironing out kinks in the production process and hand holding his employees through any problems.
19)When he resigned Cheminor in 1990, almost 125 people resigned the same day. That tells you how well he handled people.
20)Six years later, Divi founded Divi’s Laboratories, his own pharma company. Headquartered in Hyderabad, the company makes active pharmaceutical ingredients (API) and intermediates as APIs are the critical inputs for making a drug.
21)The initial plan was to focus on customizing and manufacturing small quantities of a drug for clinical trials and laboratory experiments by big pharma companies. But international pharma giants were suspicious of outsourcing to India.
22)Naproxen is an ingredient that is popularly known as an anti-inflammatory drug. It was a crowded market, and Divis was the 22nd firm to enter it behind giants such as Swiss health care company Roche and chemical and biotech firm Lonza Group.
23)But Murali Divi had made some headway in developing an efficient process to manufacture the compound and saw an opportunity there.
24)This was a time when the industry still depended on traditional chemistry methods to produce drugs.
25) These methods were simple but inefficient because they used chemicals as catalysts, increasing costs and leading to pollution.
26) He turned to newer technologies that used enzymes instead of chemicals as catalysts and devised an efficient production process for Naproxen.
27)Today, Divis Laboratories is one of the world’s largest manufacturers of Naproxen. 
28)Over time they have snatched market share to manufacture APIs such as Dextromethorphan (cough suppressant) from Lonza, pharmaceutical arm of Dutch material and life science company DSM.
29)Since the pandemic, Murali Divi has seen his wealth more than twofold to ~ $10 billion now.
30)One of the secrets of Divi’s rise to be the second-biggest drug maker in the country is its ability to scale up capacity and cut costs using advanced technology.
31)Divi’s Labs has a strong relationship with big pharma companies, including six out of the top ten innovators, Merck, Pfizer, and GlaxoSmithKline.
32)From nowhere in 1990, Divi’s Labs is now one of the top three API manufacturers in the world.


Friday, September 10, 2021

गणेशपूजनातील २१ पत्री

*गणेश पूजनादरम्यान ची २१ पत्री (वनस्पती)*

 गणेश पूजनादरम्यान २१ प्रकारच्या पत्री वाहतात. 
या प्रथेमागे पूर्वजांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे मानवाच्या सभोवताली असणार्‍या निसर्गामधील अनमोल औषधी-खजिन्याचे ज्ञान पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा शास्त्रीय हेतू डोळ्यांसमोर ठेवूनच गणेशचतुर्थीसारख्या सर्वप्रिय सणावेळी पत्री वाहण्याची प्रथा पूर्वजांनी सुरू केली आहे. हजारो वर्षांच्या निरीक्षण व संशोधनानंतर मिळालेले औषधी-ज्ञान वेगवेगळ्या आजारांचा सामना करण्यासाठी पुढील पिढ्यांनाही विनासायास मिळावे हा महत्त्वाचा हेतू या पत्री वाहाण्यामागे आहे, हे उघड आहे.

*गणेशपूजनातील २१ पत्री*

🌿 *१. #अगस्ती (हादगा)*
अगस्तीची म्हणजेच हादग्याची पाने (Sesbania Grandiflors). प्राचीन ग्रंथांमध्ये नेत्रविकारांवर अगस्तीचे प्रयोग सापडतात. जीवनसत्त्व 'अ' हे दृष्टीला पोषक असतेत्या जीवनसत्त्वाचे वनस्पतिज रूप अर्थात बीटाकॅरोटिन हे तत्त्व अगस्तीच्या पानांमध्ये ४५००० यूजी- एवढय़ा प्रचंड प्रमाणात, म्हणजे गाजरापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात असते.

🌿 *२. #अर्जुन*
अर्जुनपत्रे (Terminallia Arjuna). अर्जुन हा वृक्ष त्याच्या हृदयपोषक गुणधर्माबद्दल प्रसिद्ध आहे. 'अर्जुनारिष्ट' हे हृदयावरील औषध प्रसिद्ध आहेच. अर्जुनामध्ये मुबलक प्रमाणात असणार्‍या नैसर्गिक कॅल्शिअममुळे अर्जुनाच्या सेवनाने हाडे हस्तिदंताप्रमाणे मजबूत होतात, अशी आयुर्वेदाची मान्यता आहे.

🌿 *३. #आघाडा*
अपामार्ग म्हणजे आघाडा (Achyranthus Aspera). आघाड्याचे बरेचसे गुणधर्म हे स्त्रियांसाठी-स्त्रीरोगांवर, विशेष उपयुक्त असे आहेत.

🌿 *४. #कण्हेर*
करवीर म्हणजे कण्हेर (Nerium Odorum). हिचा उपयोग तारतम्याने करतात, कारण कण्हेरीच्या विषबाधेने हृदय व श्वसनक्रिया बंद पडून आकडी येऊन तोंड वेडेवाकडे होते.

🌿 *५. #केवडा*
केवड्याची पाने. (PendenusTectoritus). केवड्याच्या फुलाच्या रसामध्ये तयार केलेले तूप सेवन केल्यास ते मूत्रविकारावर उपयोगी पडते. दीर्घकालीन डोकेदुखीमध्ये किंवा इतर शिरारोगांमध्ये केवड्याचा लेप लावला जातो.

🌿 *६. #जातिपत्र*
जातिपत्रे अर्थात जाईची पाने (Jasminum Oriculatum). जाई व्रणरोपक आहे. एखादा बरा न होणारा व्रण (जखम) जाईच्या पानांच्या काढ्याने धुऊन, त्या जखमेवर ठेचलेली पाने लावली असता जखम बरी होते.

🌿 *७. #दाडिमपत्रे*
 अर्थात डाळिंबाची पाने (Punica Granatum). चवीला आंबट असूनही पित्तशामक असलेल्या निवडक फळांमध्ये आवळ्याबरोबर डाळिंबाचा समावेश होतो. डाळिंब आतड्याच्या रोगांवरचे गुणकारी औषध आहे. मुळाची साल ही कृमिघ्न आहे; विशेषत टेपवर्मचा (चपटय़ा कृमीं) त्रास याने नाहीसा होतो. उपलब्ध औषधे: दाडिमावलेह, दाडिमाष्टक चूर्ण. लहान मुलांना होणार्‍या जंत, जुलाब यांसारख्या आजारांमधील डाळिंबाची उपयुक्तता सर्वमान्य आहे.

🌿 *८. #बृहतीपत्रे*
बृहतीपत्रे म्हणजे डोरलीची पाने (Solanum Indicum). डोरलीसारखे रूप असणार्‍या रिंगणीच्या फळांचा व बियांचा धूर तोंडामध्ये घेतल्यास दंतकृमींचा त्रास कमी होतो, दातदुखी कमी होते आणि दात किडण्याची प्रक्रिया थांबते.

🌿 *९. #तुळसीपत्र*
तुळशीची पाने (Ocimum Sanctum), तुळशीचा सर्वप्रसिद्ध गुणधर्म म्हणजे तुळस ही सर्दी-कफ-तापावरचे प्रभावी औषध आहे. पावसाळ्याच्या दिवसात तर घरामध्ये तुळस असायलाच हवी, इतकी तुळस त्या दिवसांमधील विविध आजारांवर उपयुक्त आहे. गजकर्ण (रिंगवर्म) या त्वचाविकारावर तुळशीचा रस लावल्यास फायदा होतो.

🌿 *१०. #दूर्वांकुर*
दूर्वा (Cynodon Dectylon). गणपती हे तेज (उष्ण) तत्त्वप्रधान दैवत आहे आणि उष्णतेचे शमन करणारी एक प्रमुख वनस्पती म्हणजे दूर्वा. आयुर्वेदात वर्णिलेल्या पित्तशामक वनस्पतींमध्ये दूर्वा हे एक आद्य औषध आहे.

🌿 *११. #देवदार*
चरकसंहितेमधील अनेक रोगांवरील औषधी-प्रयोगांमध्ये देवदाराचा (Pinus Deodora) समावेश आहे. देवदाराच्या झाडाला सुरदारू असेसुद्धा म्हटले जाते.

🌿 *१२. #धत्तुरपत्र*
धत्तूरपत्र म्हणजे धोत्र्याची पाने (Datura Stramonium) हे श्वसनविकारावरील एक प्रभावी औषध आहे. परंतु धोत्र्याचा विषारी गुण योग्य-पर्याप्त मात्रेमध्ये वापरल्यासच औषधासारखा उपयोगी पडतो; अन्यथा घातक होऊ शकतो.

🌿 *१३.  #अश्वत्थपत्रे पिंपळपान*
अश्वत्थ पत्रे अर्थात पिंपळाची पाने (Phycus Religiosa). पिंपळ हा भारतातील अतिशय प्राचीन असा वृक्ष आहे; ज्याचे संदर्भ आयुर्वेदच नव्हे तर ऋग्वेदामध्येही सापडतात. संपूर्ण समाजाच्या आरोग्याची काळजी घेणार्‍या पिंपळासारख्या वृक्षांची लागवड आणि जतन करण्याची आठवण गणेशपूजनाच्या निमित्ताने करून देण्यात आलेली आहे.

🌿 *१४. #बेलपत्र*
बेलाची पाने (Aegle Marmelos. बिल्व या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती आतड्यांच्या आजारांवरील एक उत्तम औषध आहे. बेलाची तयार औषधे : बिल्वादी चूर्ण, बिल्वावलेह, बेल-मुरांबा, इत्यादी.

🌿 *१५. #बदरीपत्र*
बदरीपत्र म्हणजे बोरीची पाने (Zizyphus Vulgaris). बोराच्या बीचे चूर्ण पाण्याबरोबर घेतल्यास सारखी खा-खा होण्याचा आजार कमी होतो. बोराच्या पानांची चटणी तांदुळाच्या कांजीबरोबर घेतल्यास माणसाचा लठ्ठपणा कमी होतो.

🌿 *१६. #मरुपत्र*
मरुपत्र म्हणजे मरव्याची पाने (Origanum Margorana). मरवा अतिशय आल्हाददायक सुगंधी असतो. शरीराच्या कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे हार्मोन्स तयार करणार्‍या सर्व अंतस्रावी ग्रंथींची राणी समजल्या जाणार्‍या पियूषिका ग्रंथीला उत्तेजना देण्याचा नैसर्गिक सुगंधाहून दुसरा सोपा उपाय नाही, असे आयुर्वेद म्हणतो.

🌿 *१७. #मधुमालती*
मधुमालती म्हणजे मालती (शास्त्रीय नाव - Jasminum Grandiflorum). ही पत्री प्रामुख्याने मुखरोगांवर उपयुक्त वनस्पती आहे.

🌿 *१८. #भृंगराजपत्री*
भृंगराजपत्र अर्थात माक्याची पाने (Eclipta Alba) माक्याचा महत्त्वाचा उपयोग म्हणजे 'केश्य गुणधर्म'. केसांची वाढ आणि रंग या दोन्ही पातळ्यांवर तो उपयोगी ठरतो.

🌿 *१९. #अर्कपत्रे*
अर्कपत्रे म्हणजे रुईची पाने. (Calotropis procera.) रुई उत्तम कफनाशक औषध आहे. एकंदरच शरीरातील विविध ग्रंथींना उत्तेजना देऊन त्यांचे कार्य सुधारणारे आणि पर्यायाने शरीराचा चयापचय निरोगी करणारे असे हे औषध आहे.

🌿 *२०. #विष्णुक्रान्ता*
विष्णुक्रान्ता म्हणजे शंखपुष्पी (Evolvulus Alsinoides). बुद्धि-स्मृतिवर्धक म्हणून सुप्रसिद्ध असणारी ही शंखपुष्पी, बुद्धीवर आलेले मांद्याचे विघ्न दूर करते.

🌿 *२१. #शमीपत्र*
शमीची पाने (Prosopis Spicigera). शमी हा शब्द 'शमयति रोगान् इति' म्हणजे रोगांचे शमन करणारी ती शमी , म्हणुन नाव पडलं शमी.

संकलित #

Saturday, July 31, 2021

बिल गेट्स यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात काही अशा गोष्टी (१० नियम)

बिल गेट्स यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात काही अशा गोष्टी (१० नियम) सांगितल्या ज्या कोणत्याही शाळेत शिकविल्या जात नाहीत. 

नियम १ - आयुष्य खडतर आहे, त्याची सवय करुन घ्या.

नियम २ - जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही. स्वत:बद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करुन दाखवा. स्वतःला सिध्द करा.

नियम ३ - कॉलेजमधून बाहेर पडल्या-पडल्या पाच आकडी पगाराची अपेक्षा करु नका. एका रात्रीत कोणी व्हाईस प्रेसिडंट होत नाही, त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात.

नियम ४ - आज कदाचित तुम्हाला तुमचे शिक्षक कडक आणि भीतीदायक वाटत असतील, कारण अजून बॉस नावाचा प्राणी तुमच्या आयुष्यात यायचाय.

नियम ५ - तुम्ही केलेली चूक ही सर्वस्वी तुमची चूक आहे आणि तुमचा पराजय ह सर्वस्वी तुमचा पराजय आहे. कोणाला दोष देऊ नका, झालेल्या चुकीपासून धडा घ्या आणि पुढे चालत रहा.

नियम ६ - तुमचे पालक तुम्ही जन्माला यायच्या आधी एवढे कंटाळवाणे आणि अरसिक नव्हते जेवढे तुम्हाला ते आता वाटतात. तुमचेच संगोपन करण्याठी त्यांनी जे अमाप कष्ट घेतलेत त्यामुळेच आज त्यांचा स्वभाव असा झाला आहे.

नियम ७ - उत्तेजनार्थ पारितोषिक हा प्रकार फक्त शाळेतच पहायला मिळतो. काही शाळांमध्ये तर अगदी पास होईपर्यंत परीक्षा देता येते. बाहेरच्या जगातील पद्धत मात्र वेगळीच असते. खऱ्या जगात हरणाऱ्याला कोणीही दुसरी संधी देण्यास तयार नसतो.

नियम ८ - आयुष्याच्या शाळेत इयत्ता आणि तुकडी नसते, त्यामध्ये मे महिन्याची सुट्टी नसते. स्वतःचा शोध घ्यायला, नवीन काही शिकायला कोणी तुम्हाला वेळ नाही देत. तो वेळ तुमचा तुम्हालाच शोधायचा असतो.

नियम ९ - टीव्हीवरचे जीवन काही खरे नसते आणि खरे आयुष्य म्हणजे टीव्हीवरची सीरियल नसते. खरया आयुष्यात आराम नसतो, असते ते फक्त काम आणि काम.

नियम १० - सतत अभ्यास करणाऱ्या आणि अपार मेहनत करणारया तुमच्या मित्रांना चिडवू नका. एक दिवस असा येईल की तुम्हाला त्यांच्याच हाताखाली काम करावे लागेल 

नियम ११ - आयुष्यातल्या संधी कधीच संपत नाहीत. एक गेली तर दुसरी लगेच आपल्या समोर उभी राहते.