Monday, April 8, 2019

ज्ञान-अज्ञान

मालक किंवा खरे सद्गुरू आपल्याला ज्ञान देत नसतातच, ज्ञान म्हणून आयुष्यभर गोळा केलेले पुस्तकी संदर्भ, पूर्वग्रह, अनाकलनीय रूढी परंपरा, स्वतःच्या इच्छा, ईर्षा, अपेक्षा, हावरेपणा सोबत काम, क्रोध, द्वेष, मत्सर, राग, लोभ इत्यादी षडविकार काढून घेतात ते.

तो ज्ञान नावाचा मूर्खपणा नाहीसा होऊन आपण रिक्त झालो कि मालक किंवा सद्गुरुकंडून आपोआप प्रेरणा वा स्वानुभव मिळून त्यातून ज्ञानाची उकल होत असतेच. काही वेगळं करावं नाही लागत त्यासाठी...

विश्वातल्या अचाट पसाऱ्यासमोर, त्यातील अंतर्बाह्य संबंधासमोर आपण फार किरकोळ आहोत, आपला बुद्धिवाद, आपले संदर्भ, त्यातून वाटणारी तार्किकता फार त्रोटक आहे हे अज्ञान आधी स्वीकारावचं लागत..

ज्यावेळी आपण कबूल करतो आपण अज्ञानी आहोत आणि आपल्याला खऱ्या ज्ञानाची आस आहे तेच गुरुकृपेच्या दृष्टीने आणि खऱ्या ज्ञानाच्या दिशेने उचलेलं पहिलं पाऊल ठरतं.

!! अवधुतचिंतन योगीराज राजाधिराज शंकरबाबा महाराज की जय !!

No comments:

Post a Comment