Saturday, January 23, 2021

कुणी कुणाचेच नाही

*नेहमी लक्षात ठेवा*
*कुणी कुणाचेच नाही*

सीतेचे रखवालदार प्रभू श्रीराम होते   
जेव्हा हरण झाले तेव्हा  कोणी नव्हते.

राजा दशरथला चार पुत्ररत्न ह़ोते;
जेव्हा प्राण गेला तेव्हा कोणी नव्हते

लंकेचा राजा रावण पण शक्तिशाली होता;
पण लंका जाळली तेव्हा कोणी नव्हते

श्रीकृष्ण भगवान सुदर्शनधारी होते ;
जेव्हा बाण लागला तेव्हा कोणी नव्हते,

लक्ष्मण पण एक तरबेज योद्धा होते;
पण शक्ति लागली तेव्हा कोणी नव्हते,

शरशय्या वरती भीष्म पितामह होते;
वेदनेचे भागीदार कोणी ही नव्हते 

राजपुत्र अभिमन्यु सर्वांचे लाडके होते ;
पण चक्रयुव्ह मधून काढण्या साठी कोणी नव्हते,

सर्वां साठी,त्रिकाल बाधीत सत्य हेच आहे, 
या जगात आपले कोणी ही नाही.

ज़े विधात्याने लिहिले,आणि जसे आपले कर्म आहे,त्या पुढे कोणी जाऊ शकत नाही.

*जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर*  हेच सत्य आहे.

*केवळ कर्मच आपले आहे*       
     *देवापेक्षा कर्माची* 
      *भिती  बाळगावी,*
   *एक वेळ देव माफ करील पण कर्म नाही.*
*फुंकर मारून आपण दिवा विझवु शकतो, पण अगरबत्ती नाही. कारण ज्याचे कर्तृत्व दरवळते त्याला कोण विझवु शकत नाही..*

*🙏🏾🙏🏾*

No comments:

Post a Comment